Pune News: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या युध्दाचे सावट आता खानदेशातील केळी बाजारावर दिसत आहेत. युध्दामुळे आखाती देशांना होणारी केळी निर्यात ठप्प झाली आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेला बसला आहे. तसेच, रमजानच्या पवित्र महिन्यात जिथे केळीला मोठी मागणी असते, तिथे निर्यातीचे मार्ग बंद झाल्याने उत्पादक आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत..निर्यात साखळी विस्कळीत; १२ कंटेनरचा पुरवठा थांबलाजळगाव जिल्ह्यातून दररोज केळीचे १२ कंटेनर आखाती देशांकडे पाठवले जातात. मात्र, युद्धस्थितीमुळे विमानसेवा बंद होणे आणि समुद्री वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने ही निर्यात साखळी विस्कळीत झाली आहे. त्यातच, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर मुस्लिम देशांत शोकाचे वातावरण आहे. त्यामुळे रमजानमधील बाजारपेठेतील उत्साह कमी झाला असून आखाती देशांतील फळांची मागणी घटली आहे. परिणामी, निर्यातीसाठी तयार असलेली केळी माल आता स्थानिक बाजारातच अडकून पडली आहेत..Banana Price: केळी दरात खानदेशात घसरण.केळीच्या दरात १००० रुपयांची मोठी घसरणतसेच, युद्ध सुरू होण्यापूर्वी केळीला प्रति क्विंटल सुमारे २,५०० रुपयांचा चांगला भाव मिळत होता. मात्र निर्यात थांबताच स्थानिक बाजारात मालाची आवक वाढली आणि दर घसरले. अवघ्या काहीच दिवसांत केळीचा दर १,५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. तसेच, प्रति क्विंटल तब्बल १,००० रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले झाल्याचे शेतकरी सांगत आहेत..Banana Price: केळीसाठी हमीभाव, शासकीय खरेदी केंद्रे सुरु करणे शक्य नाही, फलोत्पादन मंत्र्यांची माहिती.शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणीजळगावची केळी ही जागतिक स्तरावर आपली ओळख राखून आहे. मात्र, जागतिक राजकारणातील या उलथापालथीमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून निर्यातीसाठी पर्यायी मार्ग शोधावा किंवा नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी जळगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे..विमानसेवा ठप्प; पर्यटक-नागरिक परदेशात अडकलेदरम्यान, या युद्धाचा परिणाम केवळ शेतीवरच नाही, तर मानवी जीवनावरही झाला आहे. पुण्यातील सुमारे ४० पर्यटक सध्या दुबईत अडकून पडले असून विमानांची उड्डाणे बंद असल्याने त्यांना मायदेशी परतता येत नाहीये. तसेच, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १५० नागरिक आखाती देशांतील विविध ठिकाणी अडकले आहेत. प्रशासनाने या नागरिकांशी संपर्क साधला असून, ते सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. राज्य सरकार आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष या नागरिकांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.