Nashik News: ‘‘कांदा उत्पादकांच्या घामाचा आणि अश्रूंचा हिशेब सरकारने द्यायलाच हवा, कांद्याला हमीभाव द्या, नाफेडची लूट तत्काळ थांबवा. बाजारहस्तक्षेप योजना राबवा,’’ अशा घोषणांनी सोमवारी (ता.१५) सटाणा शहर दणाणून गेले. .शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शहरातील साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील शिवतीर्थावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महामार्गावर चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने शहरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती..Protest For Onion Farmers: कांदा प्रश्नावर संसद परिसर दणाणला; विरोधी पक्षातील खासदारांची निदर्शने.सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रयत क्रांती शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींच्या कार्यकर्त्यांनी शासनाविरोधात भूमिका घेतली. .डॉ. सोनवणे म्हणाले, की कांद्याचा भाव उत्पादन खर्चापेक्षाही खाली आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून प्रति क्विंटल तीन हजार रुपयांचा हमीभाव मिळालाच पाहिजे. अन्यथा, हे आंदोलन अजून तीव्र केले जाईल. .Farmer Protest On Onion Rate : कांद्याला भाव द्या अन्यथा... संतप्त शेतकऱ्यांनी अडवला मुंबई ते आग्रा महामार्ग.बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे म्हणाले, की सरकार एकीकडे शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचा दिखावा करते, पण प्रत्यक्षात ‘नाफेड’मार्फत शेतकऱ्यांचा माल स्वस्तात खरेदी करून जनतेला महागात विकला जातो. ही शेतकऱ्यांची लूट तातडीने थांबवावी. .शिवसेनेचे जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांनी शेतकऱ्यांची उपेक्षा केल्यास रस्त्यावर उतरलेला शेतकरी सरकार उलथविण्याची ताकद ठेवतो. आम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करू नये. येत्या आठ दिवसांत निर्णय झाला नाही, तर बागलाण तालुका ठप्प करू. तहसीलदार कैलास चावडे व पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिले. .Onion Farmer Protest : महामार्गावर कांदा ओतून शेतकऱ्यांचा रास्तारोको.आंदोलनात संजय वाघ शिरसमणीकर, शिवसेनेचे लालचंद सोनवणे, दीपक पगार, भास्कर सोनवणे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे, विठ्ठल महाजन, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, तुषार खैरनार, व्यंग्यचित्रकार किरण मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, पांडुरंग सोनवणे, कृउबा संचालक रवींद्र सोनवणे, योगेश रौंदळ, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. .पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत, गोपनीय शाखेचे सिकंदर कोळी, जितेंद्र बोरसे, नितीन जगताप, भूषण सूर्यवंशी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. .‘ही लढाई दिल्लीपर्यंत नेऊ’कृषी मूल्य आयोगाचे सदस्य दीपक पगार म्हणाले, की मध्य प्रदेशने २०१८-१९ मध्ये बाजार हस्तक्षेप योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला. मग महाराष्ट्रात का नाही, कांदा निर्यात अनुदान द्या, वाहतुकीला सबसिडी द्या, नाहीतर आम्ही ही लढाई दिल्लीपर्यंत नेऊ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.