Crop Damage
Crop DamageAgrowon

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Heavy Rain Crop Loss : यंदा जिल्ह्यात पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून चांगला पाऊस झाला. गरजेच्या वेळी पाऊस पडत गेल्यामुळे पिकांची वाढ जोमदार झाली. मात्र, पिकांच्या काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले.
Published on

Dharashiv News : शेजारच्या लातूरसह परभणी व बीड जिल्ह्यांना ऑगस्ट व सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई शासनाकडून मंजूर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने वेगवान हालचाली करत शुक्रवारी (ता. ४) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव पाठवला.

दरम्यान जिल्ह्यात ऑगस्टमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले नसले तरी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची बाधा एक लाख ६३ हजार हेक्टरवरील पिकांना बसली आहे. यामुळे अतिवृष्टीमुळे बाधित एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना २२१ कोटी रूपये भरपाई देण्यासाठी प्रशासनाने सरकारकडे निधीची मागणी केली आहे. त्यावर आचारसंहितेपूर्वी निर्णय होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.

Crop Damage
Soybean Crop Damage : काढणीला आलेल्या सोयाबीनवर पावसाचा घाला

यंदा जिल्ह्यात पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून चांगला पाऊस झाला. गरजेच्या वेळी पाऊस पडत गेल्यामुळे पिकांची वाढ जोमदार झाली. मात्र, पिकांच्या काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर त्यात एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांच्या एक लाख ६४ हजार ९७ हेक्टवरील पिकांना अतिवृष्टीची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

यात सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला असून जिल्ह्यात एक लाख ५९ हजार ८८७ हेक्टवरील पिके अतिवृष्टीने बाधित झाली आहेत. दोन हजार ५२५ हेक्टवरील तुरीचेही अतिवृष्टीने नुकसान झाले असून २५३ हेक्टवरील उडीद, २३३ हेक्टवरील मका, १०२ हेक्टरवरील कापूस तर ९५ हेक्टवरील अन्य पिके अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडली आहेत.

या सर्व पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा नुकसान झाल्यामुळे पिकांना हेक्टरी १३ हजार सहाशे रुपयांप्रमाणे भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी २२१ कोटी ८१ लाख ३० हजार ८० रुपये निधी मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर आली असल्याने सरकारकडून तातडीने भरपाईचे प्रस्ताव मंजूर केले जात आहे. काही जिल्ह्यांचे भरपाईचे प्रस्ताव सरकारने दोन ते चार दिवसात मंजूर केले. यामुळे जिल्ह्याच्या प्रस्तावालाही तातडीने मंजूरी मिळण्याची आशा शेतकरी व प्रशासनाला आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : पीक नुकसानीचे अनुदान आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर

अतिवृष्टीचा पाच तालुक्यांना भरपाई

नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर आलेल्या अहवालानुसार ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोठेही पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले नाही. सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीचा फटका धारशिव, लोहारा, परांडा, कळंब व वाशी तालुक्याला बसल्याचे दिसत आहे.

यात प्रशासनाने सरकारला पाठवलेल्या अहवालानुसार धाराशिव तालुक्यातील ६५ हजार ६३३ शेतकऱ्यांना ९८ कोटी ४७ लाख रूपये, लोहारा तालुक्यातील ३७० शेतकऱ्यांना ४० लाख, परांडा तालुक्यातील १४ हजार ३९५ शेतकऱ्यांना साडेनऊ कोटी, कळंब तालुक्यातील ६५ हजार ३३१ शेतकऱ्यांना ७३ कोटी ४५ लाख तर वाशी तालुक्यातील ३५ हजार ५७ शेतकऱ्यांना ४० कोटी तीन लाखाची भरपाई मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com