
Kolhapur News : कोनवडे, जि. कोल्हापूर : गूळदरात होत असलेली परवड, कामगारांचा तुटवडा आणि वाढता खर्च अशा अनेक संकटांवर मात करीत भुदरगड तालुक्यातील बोटावर मोजण्याइतक्या ठिकाणी गुऱ्हाळघरे सुरू आहे.
गुऱ्हाळ उद्योग अडचणीत आला असतानाही बसरेवाडी (ता. भुदरगड) येथील गुऱ्हाळमालक अमर पाटील यांनी एकमेव गुऱ्हाळघर टिकवून ठेवले आहे. चालू हंगामात तालुक्यात बसरेवाडी, वाघापूर, गंगापूर, मडूर या चार गावांतच गुऱ्हाळघरामध्ये गुळाची निर्मिती होताना दिसत आहे.
एकेकाळी तालुक्यात पंचवीस ठिकाणी सुरू असणारा गुऱ्हाळ उद्योग अनंत अडचणींमुळे अंतिम घटका मोजत आहे. साधारणत: दिवाळी ते गुढीपाडवा यादरम्यान गुन्हाळघरे सुरू व्हायची. शेकडो लोकांना रोजगार मिळायचा.
असंख्य शेतकरी कोल्हापूर व अन्य ठिकाणी बाजारपेठेत गूळ पाठवायचे. काळाच्या ओघात गुऱ्हाळघरांना घरघर लागून असंख्य गावांतील गुऱ्हाळघरे बंद झाली. भुदरगड तालुक्यात गावांत याआधी अनेक गुऱ्हाळघरे होती; परंतु विविध समस्यांमुळे एकेक करून ती बंद झाली.
कामगार तुटवडा यांसह वाढती महागाई व गुळाला मिळत नसलेला दर यामुळे गुऱ्हाळघरे अडचणीत आली आहेत. शासनाने गुऱ्हाळ उद्योगाला संजीवनी देणे काळाची गरज आहे.
- अमर पाटील, गुऱ्हाळमालक, बसरेवाडी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.