
Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील हरभरा पिकावर बुरशीजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. मर रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात हिंगोली जिल्ह्यात १ लाख ५१ हजार ७१९ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे पीक फुलोरा तसेच घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे. जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ तसेच इतर तालुक्यांतील हरभरा पिकांवर बुरशीजन्य मर रोगाचा प्राद्रुर्भाव आढळून येतो.
त्यामुळे हरभऱ्याचे उभे पीक वाळून जात आहे. मागील आठवड्यात तुरळक ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत होता. परंतु गेल्या काही दिवसांत काही भागात विशेषतः बुरशी नाशकांची प्रक्रिया करून पेरणी न केलेल्या हरभरा पिकांमध्ये मर रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे आढळून येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.