Climate change impact on mango farming : हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आंबा बागांची पाहणी रविवारी (ता.७) पालकमंत्री नीतेश राणे यांनी केली. यावेळी आंबा पिकांचे नुकसान झाले असून बागायतदारांना भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही श्री. राणे यांनी शेतकऱ्यांना दिली. .अति थंडी, धुके आणि ढगाळ वातावरण यांसह वातावरणातील विविध बदलामुळे जिल्ह्यातील आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार ८५ ते ९० टक्के इतके नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री नीतेश राणे यांनी देवगड तालुक्यातील आंबा बागांची पाहणी केली. .Nitesh Rane: आंबा, काजू बागायतदारांना नुकसानभरपाई मिळवून देऊ.तेथील नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांशी त्यांनी चर्चा देखील केली. शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. शासन कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्त आंबा बागायतदारांना मदत मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले..Fish Policy: राज्यातील मत्स्यखाद्य बंधनकारक : नीतेश राणे.श्री. राणे म्हणाले, की बारामती येथील अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संस्थेच्या माध्यमातून आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन प्रणालीचा वापर करून आंबा शेतीचे व्यवस्थापन करण्याबाबतही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांत अधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नारनवरे आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.