Nashik News: नाशिक जिल्हा कृषी महोत्सव मार्चमध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे. या कृषी महोत्सवात शेतकरी, कृषी उद्योजक, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या..जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय कृषी महोत्सव नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशिद, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक भिवा लवटे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक स्वप्नील शिर्के, मविप्र कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते..Agriculture Festival: ‘कृषिपर्व’ महोत्सवात एआय वर विशेष मार्गदर्शन.श्री. प्रसाद म्हणाले, जिल्हास्तरीय कृषी महोत्सवासाठी ‘कृषी कुंभ’ हे नाव निश्चित करावे. महोत्सवात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक असून, यासाठी गावागावांत तालुका कृषी अधिकारी व कृषी सहायक यांनी ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. कृषी प्रदर्शनातील स्टॉल्सपैकी जास्तीत जास्त स्टॉल्स शेतकऱ्यांच्या उपयोगाचे असावेत..कृषी विभागाच्या योजनांची माहिती व नोंदणीसाठी संगणकीय व्यवस्था असावी. बँका व विमा कंपन्यांचाही सहभाग महत्त्वाचा ठरेल. महोत्सवाचा प्रचार व्यापक स्वरूपात करावा. कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करावे. शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आमंत्रित करावे. महोत्सवासाठी आवश्यक निधीसाठी जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करून मान्यता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या..Agriculture Festival: अहिल्यानगरमध्ये शेतकरी, महिलांसाठी कृषिपर्व महोत्सव.‘आत्मा’चे प्रकल्प संचालक श्री. काशिद यांनी नियोजनाचे सादरीकरण केले. या वेळी पशुसंवर्धन विभागामार्फत परळी वैद्यनाथ येथे होणाऱ्या महा पशुधन एक्स्पोच्या लोगोचे अनावरण जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले..कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालनाकृषी महोत्सवाच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण कृषी साधने, सुधारित बियाणे, सेंद्रिय शेती पद्धती तसेच शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. स्थानिक कृषी उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेल, अशी व्यवस्था करावी. .प्रदर्शनात कृषी विभाग, संलग्न यंत्रणा, बँका, कृषितज्ज्ञ तसेच कृषी प्रक्रिया उद्योग यांनी सहभागातून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे. कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.