
Nanded News : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तब्बल २८ वर्षांनंतर तोट्यातून बाहेर आली आहे. ८८ टक्के एनपीएफ १५ टक्क्यांच्या आत आला आहे. या वर्षी जिल्हा बँकेने ५४ कोटींची परतफेड करून चालू वर्षात नऊ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमविल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी बुधवारी (ता. २) पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वर्ष २००० मध्ये ताळेबंद बिघडल्याने रिझर्व्ह बँकेने २० ऑक्टोबर २००५ रोजी बँकेवर बँकिंग नियमन कायद्याप्रमाणे निर्बंध लागू केले होते. तसेच राज्याच्या सहकार खात्यानेही बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक व त्यानंतर प्रशासकीय मंडळ नेमले. २००७ अखेर बँकेचा संचित तोटा ३७० कोटी रुपये व एनपीए ५७३ कोटी इतका झाल्याने बँक डबघाईस आली होती.
त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासनाकडून बँकेला ११० कोटी रुपये कर्ज देऊन त्याला अनुदानामध्ये रूपांतरित केले होते. बँकेवर नियुक्त प्रशासक मंडळाने खर्चाच कपात केली. त्यामुळे २०१५ पासून बँकेचा कारभार पुन्हा संचालक मंडळाच्या हाती आला. गेल्या दहा वर्षांत केलेल्या पाठपुरामुळे थकहमी पोटी शासनाकडून २५ कोटी मिळाले. तर कलंबर साखर कारखाना विक्रीतून २२ कोटी व अन्य निधी मिळाल्याने बँकेची स्थिती काही प्रमाणात सुधारण्यास मदत झाली.
जिल्हा बँकेने ग्राहकांचाही विश्वास संपादन करत मोठ्या प्रमाणात बँकेत डिपॉझिट मिळविले. त्यानंतर जिल्हा बँकेवर संचालक मंडळ अस्तित्वात आल्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली.
२००७ मध्ये ३७० कोटी रुपये एनपीए होता तो कमी होऊन तब्बल २८ वर्षांनंतर बँक संचित तोट्यातून मुक्त होऊन निव्वळ नफ्यामध्ये आल्याने अध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनी सांगितले. बँकेचा एनपीएफ १५ टक्क्यांच्या आत आल्यामुळे बँकेच्या ६३ शाखा पैकी ५१ शाखा नफ्यात आहेत. तर गोळेगाव, मांडवी, शिराढोण व लिंबगाव या चार शाखा तोट्यात आहेत.
जिल्हा बँकेत या वर्षात १५६ अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून ही भरती पारदर्शक ऑनलाइन पद्धतीने राबविले जाणार आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मार्च २०२४ मध्ये संचित तोटा शिल्लक होता. तर तो २०२५ मध्ये ४४ कोटी ५२ लाख रुपयांची परतफेड करून दहा कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरला आहे. याप्रमाणे एकूण ५४ कोटी रुपयांची परतफेड करू ९ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावण्याची माहिती खतगावकर यांनी दिली. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांची उपस्थिती होती.
बॅंकेच्या ठेवीत वाढ...
जिल्हा बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यामुळे बँकेच्या ठेवीमध्ये तब्बल ११७ कोटींची वाढ झालेली आहे. बँकेमध्ये ८८९ कोटीचे डिपॉझिट झाले. ९७८ संस्थांना ५३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज बिनव्याजी देत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.