Vidhansabha Live : सरकारने 'बनिया' वृती सोडून द्यावी, असे म्हणत कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी शेती प्रश्नावरून गुरुवारी (ता.५) विधानसभेत सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेमध्ये २९३ च्या प्रस्तावावर आमदार पटोले बोलत होते. यावेळी सोयाबीन-कापूस दर, भारत-अमेरिका करार, पीएम किसान आणि पिक विम्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार टिका केली..शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देऊन त्यांच्या शेतमालाचे दर पाडले जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला. "पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार दिले जातात. पण खताचे भाव आणि डीझेलचे भाव वाढले आहेत. त्यामुळे किंमती वाढल्या आहेत. शेतकऱ्यांकडून एक लाख रुपये घ्यायचे आणि त्याला सहा हजार रुपये द्यायचे, ही 'बनिया' वृत्ती सोडा." अशी टिका त्यांनी केली..यावेळी शेतीचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना सहा हजार रुपये जास्त कसे मिळतील, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचे पटोले म्हणाले. तसेच अनेक शेतकऱ्यांना ते पैसे मिळत नाहीत. त्यात पीएम किसानचं अॅप बदलतं, केवायसी आणि त्रूटीच्या नावाने शेतकऱ्यांना रडकुंडीस आणण्याचं काम सरकार करतं. त्यामुळे सरळ पैसे जमा होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली..PM Kisan Scheme: एक लाख ७२ हजार शेतकरी राहणार वंचित.फसवी पीकविमा योजनानाना पटोले यांनी पीकविमा योजनेवरूनही सरकारवर निशाणा साधला. पीकविमा योजना अक्षरक्ष: फसवी योजना असून पीकविमा कंपन्या पंतप्रधानांच्या 'मित्रों'च्या असल्याचा आरोप त्यांनी केली. "पीकविमा कंपन्या आपल्या सोयीनुसार नियम तयार करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा पीकविमा मिळत नाही. एक रुपयात राज्य सरकारने पीकविमा दिला. पण कृषिमंत्री सांगत होते की, ही भिक आहे. आता सरकारने ती योजना बंद केली.म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करत आहे." असेही पटोले म्हणाले..तसेच पीकविमा कंपन्या तांत्रिक कारणे दाखवून भरपाई नाकारतात. तसेच राज्याचा हिस्सा लवकर भरला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसे विमा कंपन्या भेटतो. पण शेतकऱ्यांना भरपाई मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले..भारत-अमेरिका करारभारत-अमेरिकेतील व्यापार करारावरून नाना पटोले यांनी सरकारचा समाचार घेतला. अमेरिकेसोबत करार केल्यामुळे सोयाबीनचा भाव दीड हजार रुपयांनी खाली पडला. कापसाचे भाव पडले. आता युद्धामुळे तर अन्नधान्याचा कार्यक्रम वाजल्याचे पटोले म्हणाले. शेतकरी हवालदिल असल्याने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही, असंही त्यांनी ठणकावून सांगितले..India-USA Trade : भारताच्या वाटाणा आयात शुल्कावर अमेरिकन सिनेटर नाराज; ट्रम्प यांना पत्र लिहून केली हस्तक्षेपाची मागणी.तसेच इराण-इस्त्रायल, अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या निर्यातीच्या प्रश्नावर पटोले यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. सरकारने नफा तोट्याचा विचार न करता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे, असेही ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.