Soybean Price : सोयाबीनला ६ हजारांचा भाव मागणाऱ्या भाजपला सत्तेत येताच याचा विसर : नाना पटोले

Nana Patole : राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे. तर राज्य सरकारसह केंद्रातील सरकार फक्त धनदांडग्यांचे असल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे.
Nana Patole on Soybean Price
Nana Patole on Soybean PriceAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यासह केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असून ते धनदांडग्यांचे आहे. याआधी विरोधी बाकावर असणारे भाजप आता सत्तेत आले आहे. त्यावेळी सोयाबीन पीकाला ६ हजार हमीभाव देण्याच्या मागणीवरून भाजप सतत आंदोलन करत होते. पण आता सत्तेत असणाऱ्या भाजपला आपल्याच मागणीचा विसर पडल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

राज्यासह मध्य प्रदेश आणि हरियाणातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला ६ हजार रूपये हमीभाव मिळावा, अशी मागणी करत आहेत. मध्य प्रदेश आणि हरियाणात यावरून जोरदार आंदोलने केली जात आहे. तर आता महाराष्ट्रात देखील सोयाबीनच्या दरावरून ठिणगी पडली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी आज शरद पवार गटाच्या नेतृत्वात मुंबईत मंत्रालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर सोयाबीन फेकून सरकारचा निषेध केला.

Nana Patole on Soybean Price
Soybean Guaranteed Price : मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनचा मुद्दा चिघळला? शेतकरी ६ हजारांवर ठाम, संयुक्त किसान मोर्चा महामार्ग रोखणार

यावरून नाना पटोले यांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली आहे. पटोले यांनी. राज्यासह केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असून सरकारला शेतकऱ्यांची चिंता नसल्याचा टोला लगावला आहे. तसेच राज्यासह केद्रातील सरकार हे धनदांडग्यांच असून सरकार फक्त यांच्यासाठीच काम करत आहे. राज्यात यंदा दुष्काळ होता. त्यात आता अतिवृष्टीमुळे धान, कापूस, फळभाज्या अशा सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. पण सरकारला सर्वे करायला देखील वेळ नाही, असा आरोप पटोले यांनी केला आहे.

Nana Patole on Soybean Price
Soybean Rates : सोयाबीन, धान आणि मक्याच्या किमतीवरून शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार; मंडई आणि तोलाई केंद्रांवर करणार आंदोलन

तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना हेच भाजपवाले विरोधी बाकावर होते. तेव्हा सोयाबीन पीकाला ६ हजार हमीभाव द्या अशा मागणी करत आंदोलन करत होते. पण आता सत्तेत असणाऱ्या भाजपला आपल्या मागणीचा विसर पडला आहे. आता सत्तेत बसून सोयाबीनला ४ हजार भाव दिला जात आहे. डिझेलचे भाव, खतांचे भाव, बी बियाणे महाग झालेत. पण सोयाबीनचा भाव काही वाढत नाही. यामुळेच शेतकरी संकटात आला आहे. तर आज याचा उद्रेक मंत्रालयाच्या प्रवेशावर झाला. येथे तरूण शेतकऱ्याने सोयाबीन मंत्रालयासमोर ओतून आपला सरकारविरोधात राग व्यक्त केल्याचे पटोले म्हणाले.

६४ हजार बहिणींचे काय झाले?

एकीकडे राज्य सरकार लाडकी बहिणी योजनेचा मोठा गवगवा करत आहे. जाहिरातबाजी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. मात्र दुसरीकडे राज्यातील एका वर्षात सुमारे ६४ हजार मुली, महिला बेपत्ता झाल्या. त्या लाडक्या बहिणींचे काय झाले? असा सवाल पटोले यांनी सरकारला केला आहे. सरकारने खुलासा करावा, अशी मागणी केली आहे.

तसेच महिला बेपत्ता प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केले असता राज्य सरकारने त्याचे उत्तर देणे टाळले. विधानसभेत देखील जेव्हा हा प्रश्न मांडला तेव्हा राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी पळ काढला. भंडाऱ्यात डब्बे वाटपाच्या कार्यक्रमात महिलांवर लाठीचार्ज केला. महिलांना मारण्याचा अधिकार फडणवीस यांनी पोलिसांना दिला आहे का? असा सवाल देखील पटोले यांनी यावेळी केला. तर नाना पटोले यांनी सध्याचे राज्यातील सरकार हे महिला विरोधी असल्याचीही टीका केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com