Pune News: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी सुमारे सहा टक्के क्षेत्राला फटका बसला आहे. परंतु यंदा सुधारित पीकविमा योजना लागू केल्यामुळे शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी विमा भरपाई मिळणार नाही. .अनेक शेतकरी पीकविमा भरपाईसाठी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देत आहेत. पण पूर्वसूचना देता येत असल्या तरी त्यावर पुढे काहीच कार्यवाही होणार नाही. शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई केवळ पीक कापणी प्रयोगाच्याच आधारे मिळणार आहे..Crop Insurance : जालन्यातील दोन लाख ६१ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा.राज्य सरकारने यंदा सुधारित पीकविमा योजना लागू केली. त्यानुसार आधीच्या योजनेतील महत्त्वाचे चार ट्रिगर काढून टाकण्यात आले. त्यातही सर्वाधिक महत्त्वाचा ट्रीगर होता. स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा. जुन्या पीक विमा योजनेनुसार शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्यानंतर त्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना दिल्यावर वैयक्तिक पातळीवर पंचनामे होऊन भरपाई मिळायची. सध्या अनेक भागांत जोरदार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झाला. जमीन खरडून गेली. जुन्या योजनेत या नुकसानीसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगरमधून भरपाई मिळाली असती..परंतु आता हा ट्रिगरच काढल्याने शेतकऱ्यांना यंदा त्यातून भरपाई मिळणार नाही. सुधारित पीकविमा योजनेत फक्त पीक कापणी प्रयोग हाच एकमेव निकष आहे. पीक लावणीपासून ते काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांत पिकांचे नुकसान झाल्यावर उत्पादकता कमी येईल आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळेल, असा दावा सरकारने केला आहे. पीक कापणी प्रयोगानंतर संबंधित मंडळातील उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे..Crop Insurance : सोलापुरात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद.उंबरठा उत्पादनाचा खोडापीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देण्यात महत्वाचा अडसर उंबरठा उत्पादनाचा आहे. उंबरठा उत्पादन काढताना संबंधित मंडळातील मागील सात वर्षांतील सर्वाधिक उत्पादन आलेल्या पाच वर्षांतील उत्पादनाची सरासरी काढली जाते. आलेल्या उत्पादनाच्या सरासरीला ३० टक्क्यांचा जोखीम स्तर लावला जातो. उदा. एखाद्या मंडळातील मागील पाच वर्षांतील उत्पादनाची सरासरी १० क्विंटल असेल, तर त्याला ३० टक्क्यांचा जोखीम स्तर लावून सात क्विंटल उंबरठा उत्पादन येते. .आता त्या मंडळातील पिकाचे उत्पादन सात क्विंटलपेक्षा कमी आले तरच त्या मंडळातील शेतकरी पीक कापणी प्रयोगानंतर भरपाईस पात्र ठरतील. म्हणजेच उत्पादनात किमान ३० टक्के घट यायला हवी. उत्पादन २९ टक्के कमी आले तरी भरपाई मिळणार नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना आतापर्यंत या ट्रिगरमधून सर्वात कमी भरपाई मिळत आली. यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे..पूर्वसूचना देऊ शकता, पण उपयोग नाहीसरकारने विमा योजनेतून लावणीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात नुकसान भरपाई देणारे ट्रीगर काढून टाकले. मात्र शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसूचना देण्याचा पर्याय ठेवला. शेतकरी सध्या होत असलेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना देऊ शकतात. पण यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही किंवा पिकांचे पंचनामे होणार नाहीत. कितीही पूर्वसूचना दिल्या तरी हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोगाच्या आधारेच नुकसान भरपाई काढली जाणार आहे..खरिपाचे ६ टक्के नुकसानराज्यात खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र १४४ लाख हेक्टर आहे. तर आतापर्यंत १४२ लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा झाला. त्यापैकी साडे आठ लाख हेक्टरवरील पिकांचे पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजेच एकूण पेरणी क्षेत्राच्या जवळपास सहा टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे क्षेत्र अंतिम आकडेवारी आल्यानंतर आणखी वाढू शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीकविम्याचा आधार हवा होता. सरकारने विमा योजनेत बदल केला नसता तर शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी विमा भरपाई मिळाली असती. पण आता सुधारित विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.