अनिल पाटीलकॅलिफोर्निया सहकारी भात फाउंडेशन या संशोधन केंद्राचा विस्तार एक हजार एकरावर आहे. भात हे अमेरिकेचे मूळ पीक नाही. अमेरिकेत जून ते ऑक्टोबर या काळात उन्हाळा असतो आणि या काळातच येथे भात शेती केली जाते. धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून भात शेतीला दिले जाते. येथील शेतकऱ्यांकडे कमीत कमी ५० एकरांत भात लागवड असते. या देशात ४०० एकर क्षेत्र असलेला शेतकरी हा लहान शेतकरी आहे..कोकणामध्ये भात हे महत्त्वाचे पीक. कारण कोकणात पावसाची सरासरी २५०० मिमी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरी त्यामध्ये भात शेती होते. मी स्वतः भात लागवड करणारा शेतकरी आहे. खरे तर हे पीक परवडत नाही. पण इलाज नाही कारण आमच्या भागात इतका पाऊस पडतो, की दुसरे पीक घेता येत नाही..मग कॅलिफोर्निया राज्यात ४०० मिमी एवढा कमी पाऊस असताना भात शेती का केली जाते? हा प्रश्न मला पडला होता. त्यासाठी मी कॅलिफोर्निया सहकारी भात फाउंडेशन या संशोधन संस्थेच्या प्रक्षेत्रावर माहिती घेण्यासाठी सकाळी आठ वाजता वेळेवर पोहोचलो. अमेरिकेच्या कृषी विभागाची या संशोधन केंद्राला मदत मिळाली आहे..American Agriculture: अमेरिकेतील शेतकऱ्याच्या शेतीवर शिवारफेरी.......असे आहे संशोधन प्रक्षेत्रकॅलिफोर्निया सहकारी भात फाउंडेशन या संशोधन केंद्राचा विस्तार एक हजार एकरावर आहे. सात विभागामध्ये हे प्रक्षेत्र विभागलेले आहे. आम्हाला एका विभागातून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वाहनातून न उतरवता गट आला, की माहिती दिली जात होती. आम्ही भेट दिलेल्या दिवशी एकूण पाच गट या प्रक्षेत्रावर आले होते. प्रत्येक गटामध्ये १०० शेतकरी होते. .प्रत्येक प्रक्षेत्रावर माहिती देण्यासाठी कृषी अधिकार माईक घेऊन उपस्थित होता. माहिती देऊन झाली, की शेतकऱ्याचे प्रश्नांना उतरे दिली जात होती. या प्रक्षेत्रावर पाहिलेला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अमेरिकेत भात शेतीसाठी रोपवाटिका तयार करणे आणि रोप लावणे ही पद्धत नाही. परंतु या भागात कमी पाऊस असताना भात शेती कशी करतात, याचे उत्तर मला चर्चेतून मिळाले..अमेरिकेतील भात शेतीअमेरिकेत आपल्यासारखी पावसाळी भात शेती करत नाहीत. भात हे अमेरिकेचे मूळ पीक नाही. अमेरिकेत जून ते ऑक्टोबर या काळात उन्हाळा असतो आणि या काळातच येथे भात शेती केली जाते. धरणाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून भात शेतीला दिले जाते. येथील शेतकऱ्यांकडे कमीत कमी ५० एकरांत भात लागवड असते. या देशात ४०० एकर क्षेत्र असलेला शेतकरी हा लहान शेतकरी आहे. बारकावे, सूक्ष्म नियोजन आणि वक्तशीरपणा असलेले शेतकरीच मोठ्या प्रमाणात शेती करू शकतात..येथे भात लागवड करताना पाणी सोडून चिखलणी केली जाते, त्यानंतर जमीन समपातळीत केली जाते. त्यानंतर भाडेपट्टीवर लहान विमान घेऊन भाताचे अंकुर आलेले बियाणे पेरले जाते. हे मला खूप नवीन वाटले. फार लहान क्षेत्र असलेल्या ठिकाणी, ट्रॅक्टरचलित यंत्राने भात बियाणे चिखलावर पेरले जाते. मात्र बीजोत्पादन क्षेत्र किंवा संशोधन प्रक्षेत्रावर भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. .भाताचे अंकुर आलेले बियाणे पेरणीची पद्धत असल्याने तण व्यवस्थापन ही मोठी डोकेदुखी आहे. त्यासाठी तणनाशक फवारणी केली जाते. याबाबत सातत्याने संशोधन सुरू आहे. येथील संशोधनात शेतकऱ्यांना देखील सहभागी करून घेतले जाते. काही संशोधनाचे प्रयोग शेतकऱ्यांच्या शेतावर घेतले जातात. त्यासाठी दरवर्षी ‘भात दिवस’ आयोजित केला जातो. येथील शेतकरी फवारणीसाठी ड्रोनचा वापर करतात. .पिकाच्या गरजेनुसार जमिनीपासून वेगवेगळ्या उंचीवर ड्रोन उडवले जातात. प्रत्येक उंचीवर पाण्याचे प्रमाण, हवामान, नोझलचा प्रकार, फवारणीचा दर याचे गणित ठरलेले आहे. याठिकाणी गरजेनुसार विविध क्षमतेचे ड्रोन वापरले जातात. येथील संशोधन प्रक्षेत्रावर आम्हाला विविध ड्रोनच्या वापरबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. खत व्यवस्थापनाबाबत देखील येथे मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे..Agri Tourism Model: शेतीला कृषी पर्यटन, तंत्रज्ञानाची जोड.अमेरिकेत शून्य मशागत तंत्रज्ञानाबाबत देखील मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. बरेच शेतकरी या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना दिसतात. भाताची लागवड जमीन न नांगरट करता सीड ड्रिल च्या मदतीने केली जाते. उन्हाळ्यात नांगरट करून जमीन भुसभुशीत केली जाते. त्यानंतर पुढील वसंत ऋतूमध्ये नवीन मशागत न करता, त्यात थेट पेरणी केली जाते. या तंत्रज्ञानाचा अवलंब करताना पीक पोषण व्यवस्थापन, पाण्याचा वापर, हरितगृह वायूचे उत्सर्जन, तण नियंत्रण आणि एकात्मिक पद्धतीने कीड आणि रोग नियंत्रण केले जाते..अमेरिकेत आयात होत असलेल्या लांबट आकाराच्या तांदळामध्ये विशेषतः सुगंधी लांबट जातींचे मोठे प्रमाण आहे. यातील बहुतांश तांदूळ आशियातून आयात केला जातो. जस्मिन तांदूळ प्रामुख्याने थायलंडमधून आणि बासमती तांदूळ हा प्रामुख्याने भारत व पाकिस्तानमधून येतो. अमेरिकेत या तांदळाची मागणी वाढत असल्याने आयात खर्च वाढला आहे. .त्यामुळे कॅलिफोर्निया राज्यामध्ये जस्मिन आणि बासमती भात लागवडीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अमेरिकेत भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध सुविधा दिल्या जातात. यातून तांदळाची काही प्रमाणात आयात कमी करणे शक्य होईल, असे येथील सरकारला वाटते. त्यामुळे सातत्याने नवीन जाती विकसित करण्यावर येथील संशोधन केंद्राचा भर आहे..अमेरिकेतील भात शेती पाहून असे मला वाटते, की कोकणात भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण करण्यासाठी आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठांनी संशोधनाला गती दिली पाहिजे. मशागत कमी करून, उन्हाळ्यात जमिनीची नांगरट भुसभुशीत करून वसंत ऋतूमध्ये पेरणाऱ्या शेतकऱ्यांच्या गटासोबत विद्यापीठातील तज्ज्ञांनी चर्चा केली पाहिजे. राज्यात अनेक प्रयोगशील शेतकरी भात शेतीमध्ये विविध प्रयोग करत आहेत. विशेषतः प्रतापराव चिपळूणकर, चंद्रशेखर भडसावळे, निलिकेश दळवी, मोहन ठाकरे यासारख्या भात उत्पादक शेतकऱ्यांचे प्रयोग दिशादर्शक आहेत..माहिती तंत्रज्ञानावर भरमला कॅलिफोर्निया राज्यातील सिलिकॉन व्हॅलीमध्ये आल्यावर एक नवीन बाब समजली, की माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या माध्यमातून यापुढे शेती करण्यासाठी, ऑटोमाझेशन आणि रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भर दिला जाणार आहे, असे झाले, तर शेतीचे स्वरूप पूर्ण बदलून जाणार आहे. यासाठी आपल्याला पूर्वनियोजन आणि तयारी करण्याची गरज आहे. कदाचित हे आव्हान जे स्वीकारणार नाहीत, ते शेतीतून बाहेर पडतील. भविष्यातील शेतीचे स्वरूप लक्षात घेता समविचारी युवा शेतकऱ्यांना एकत्र करून शेतकरी बचत गट किंवा उत्पादक कंपन्या स्थापन करणे आवश्यक आहे..गटाने शेती केल्यामुळे यांत्रिकीकरण सोपे होणार आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. २०१९ मध्ये आम्ही भात शेतीचे यांत्रिकीकरण हा उद्देश समोर ठेवून वैतरणा शेतकरी उत्कर्ष मंडळ तयार केले. या माध्यमातून भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण केले. अशाप्रकारे नवीन संधी उपलब्ध होणार आहेत, त्याचा अंदाज शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. जर आपण हे आवाहन स्वीकारले नाही, तर कार्पोरेट क्षेत्रातील भांडवलदार हे करणार असल्याचे दिसून येते. त्यासाठी आपण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करार शेतीसारखा बदल घडवला पाहिजे. .कॅलिफोनियामधील शेती बघत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या लक्षात आला, की जे इथे आहे ते आपल्याकडे नाही, पण ते आपण निर्माण करू शकतो. पण जे आपल्याकडे आहे, ते अमेरिकेतील शेतकरी आणि सरकार करू शकत नाहीत. ते म्हणजे, भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश, निसर्ग व पाणी. आपल्या देशाला सूर्याचा देश असे श्री. अ. दाभोळकर यांनी म्हटले आहे. सूर्याची किरणे जेव्हा ऊर्जा देतात तेव्हा शेती चवदार व गोड होते.- अनिल पाटील ९९७०९७८७००(लेखक सांगे, ता. वाडा, जि. पालघर येथील प्रयोगशील शेतकरी आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.