
Nashik News : जिल्हा परिषदेच्या ‘मिशन भगीरथ प्रयास’ उपक्रमाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे काठीपाडा (ता. सुरगाणा) येथे शेती व पूरक व्यवसायांची वाढ झाली आहे.
दोन वर्षांपूर्वी या गावात सुमारे ५०० लिटर दूध संकलन व्हायचे. आता याच गावातून ३५०० लिटर दुधाचे संकलन होत असल्याने संकलनात सहापटींनी वाढ झाली आहे. तर भूजल पातळी वाढल्याने आता टोमॅटो, काकडी यांसह पालेभाज्या उत्पादन घेत आहेत.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून २०२२ मध्ये मिशन भगीरथ प्रयास उपक्रम सुरू झाला. कायम पाणी टंचाई व दुष्काळ सदृश परिस्थिती असणाऱ्या गावांमधील भूजल पातळी वाढविण्याच्या मुख्य हेतू होता. यात काठीपाडा ग्रुप ग्रामपंचायतीची निवड झाली. उपक्रमाच्या माध्यमातून दोन बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली.
भूजल पातळी वाढल्याने शेती व पूरक व्यवसायांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. येथील प्रमुख व्यवसाय हा भातशेती होता, आता भाजीपाला पिके घेतली जात आहेत. पूर्वी पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे शेतात खरिपानंतर पीक घेतली जात नव्हते. परिणामी, रोजगारासाठी लोक स्थलांतर करीत होते.
मात्र ‘मिशन भगिरथ प्रयास’ उपक्रमामुळे गावात भूजल पातळी वाढल्याने आता मात्र भात शेती बरोबरच गावकरी टोमॅटो, काकडी, पालेभाज्या यांचे उत्पादन घेत आहेत. यामुळे शेती उद्योगास चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांना बारमाही काम मिळाल्यामुळे स्थलांतरण कमी झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.