प्रा. डाॅ. केशव देशमुखMarathi Literature: आपण हे जाणून असतो, की भाषाविज्ञानातील विविध सिद्धांत असे नमूद करतात : एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर आदळून निर्माण झालेल्या ध्वनीतून भाषा उत्पन्न झाली किंवा निसर्गातील नाना प्रकारचे नाद-निनाद, जसे की वारा, पाणी, पाऊस, अरण्यातील वृक्षराजींच्या पर्ण, शाखांचे ध्वनी यातील स्वनसदृश तसेच व्यंजननिकट असलेले एकंदर अनेक अर्थहीन आवाज, या आवाजातील आरोह अवरोह मानवाने अनुकरण अनुसरत उचलले आणि भाषा जन्मली. भाषेच्या जन्मासंबंधात आधीची ही स्थिती तंतोतंत कबूल करता येणारी नसली तरी भाषेची ध्वनिमूलकता पडताळून पाहताना वर नोंदविलेले हे सगळे ‘आवाज’ भाषेचा पूर्वपथ समजून घेताना स्वीकारार्ह ठरू शकतात..भाषा असे म्हणण्यापेक्षा त्याला आपण नैसर्गिक ध्वनी अथवा नैसर्गिक निनाद म्हणूया, ज्यामुळे मानवाला भाषिक ज्ञान होत गेले हे तर निःसंशय. म्हणजे पटपट, खटखट, दणदण, सरसर, झुळझुळ, खळखळ यासारखे नादानुकारी एकसमान अक्षरसाखळींचे शब्द मानवाने सृष्टीचक्रातील आपसूकच कानावर पडलेल्या आवाजातून घेतले असणार हे पक्के. हळूहळू पुढे हे ध्वनिधन वाढत गेले असणार..या ध्वनीतून संकेत मिळत गेले असणार. त्यातूनच मानवाला अनेक घटनांची लागत गेलेली चाहूल, जाणवणारे वेगवेगळे धोके, अशा आवाजातून होणारा आनंद किंवा बचावासाठी घ्यावी लागणारी सावधानी आणि पुष्कळदा भयोत्पन्न या आवाजाची त्यास वाटणारी भीती यासंबंधीचे अनुकूल प्रतिकूल असंख्य बोध माणसाला झाले असणार हे पण अगदी निश्चित. म्हणजेच मानवी ज्ञानाला, त्याच्या आकलनाला हे अनेक सुरावटीचे सुगम सुलभ आवाज भाषिकदृष्ट्या पूरक आणि उपकारक ठरलेले असणार याविषयी संदेह असावयाचे तसे कारण नाही. कारण नसावे..International Mother Language Day: मातृभाषेतील शिक्षणच सर्वसमावेशक.मराठीच्या बोली या लोकभाषा. अर्थात त्या निःसंशय ज्ञानभाषा. तंत्रज्ञानाचा एकप्रकारे हट्ट (दुराग्रह) धरून मराठी बोली या ज्ञानभाषा व्हाव्यात हे म्हणणे काहीसे अनाठायी वाटते. बोली काय किंवा भाषा काय ही उभय क्षेत्रे सांस्कृतिक शिवाय सामाजिक अशा विस्तारमूलक ज्ञानाचीच आहेत. कोणतीच भाषा अज्ञानाची नसते. परंपरेच्या अव्याहत वाहत्या सरितेतून बोली या माध्यम बनून समाजाला पिढ्यान््पिढ्या ज्ञान देतच असतात. त्यामुळे मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे या विधानाची खरे तर मला गंमत वाटते. उलट ही भाषा जगाच्या सर्व दिशांत नेण्यासाठी आपण डिजिटल प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आपण म्हणायला हवे. मराठी बोली ही कुठल्याही शर्तीवर ज्ञानभाषाच आहे. लोकानुभवांचे तिला वरदान आहे. तिला बलाढ्य अशी सांस्कृतिकता आहे. भूमी आणि भाव या पातळीवर मराठी बोलीचा पैस हा तर महाप्रचंड आहे..एक नोंद खासकरून करायला हवी, की महाराष्ट्र राज्याच्या भाषा सल्लागार समितीने सन २०१४ मध्ये चौसष्ट पानी लक्षणीय मसुदा प्रकाशित केलेला होता. त्यात असे नमूद केले होते, की मराठी भाषेचा वापर हा केवळ अस्मितेचा प्रश्न नसून तो मराठी माणसाच्या अस्तित्वाचाही प्रश्न आहे. याचाच अर्थ माणूस आणि भाषा यांना संवाद आणि भाषिक व्यवहार या दोन्ही पातळ्यांवर विभक्त करून चालू शकत नाही. याच प्रसिद्ध केलेल्या मसुद्यात पुढे असेही नमूद केलेले आहे, की नव्या तंत्रज्ञानाचे उपयोजन करून मराठी भाषेची शब्दसंपत्ती गोळा करावी. लोककथा, लोकगीते, लोककला यांच्या संहिता संकलित आणि प्रकाशित कराव्यात. महाराष्ट्रातील विविध बोलींचे शब्दकोश तयार करणे, ज्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. लोककलांच्या माध्यमातून मराठी भाषेचा विकास होईल हे पाहणे गरजेचे आहे..Marathi Language: महाराष्ट्रात सक्ती मराठीचीच.भाषेतलं शब्दधनकुठल्याही भाषेचा पैस समजून घेताना शब्दधनाच्या अर्थवाहक नोंदी फारच महत्त्वाच्या ठरतात. कारण या एकंदर शब्दधनात काळाची भावयात्रा प्रविष्ट असते. त्यात संस्कृतीचा रस भरलेला असतो. शिवाय त्यातच पिढ्यान््पिढ्यांचे भाषिक संचितही सामावून असते. याचाच दुसरा अर्थ असा, की भाषेतलं हे शब्दधन म्हणजे काही केवळ ओहळातील पत्थर नसतात. आता हेच पाहा : पडणे, खाणे, सोडणे, मागणे, पळणे, घालणे, घेणे, फिरणे, काढणे या क्रिया अथवा ही क्रियापदे मराठी बोलीत ‘सनी’ असे अंत्यपद मूळ शब्दाला जोडून पडूनसनी, खाऊनसनी, सोडूनसनी, मागूनसनी अशी तयार झालेली पाहायला मिळतात. लोकभाषेतील ही अशी शिदोरी भाषेचा गोडवा आणि मराठी सुलभतेतला ढंग दाखविते. तिच्यातला हा मूळ हेल जणू आपल्या मनात नव्या रसाची निष्पत्तीही करतात..आता गंमत बघाशिव्या ऐवजी श्या, ठेव ऐवजी ठू, खूप ऐवजी गंज किंवा मोप, पितो ऐवजी पेतो, विकतो ऐवजी इकीतो, ठेवतो ऐवजी ठुतो हा सगळा मराठी भाषेतील शब्दसंभार वस्तुतः पुस्तकात नसलेला आणि शिक्षणातून सुटलेला अशा स्वरूपाचा शब्दसंभार आहे. त्याअर्थी ही लोक-भाषा आहे. त्यातही पुन्हा ती गावभाषा आहे आणि ती जनभाषा आहे. महत्त्वाचे म्हणजे गावखेड्यांच्या एकूण जीवनाचे रंगगंध या शब्दशिदोरीची मिठ्ठास अधिकच खुलवतात हे विशेष! इथे माझे - तुझे नसते. मपलं - तुपलं असे म्हटले की भागते. ‘समसमान’ हा असा कोरडा शब्द बोलीत जणू खोटे नाणे होऊन जातो. त्यापेक्षा, ‘सारक्यावारक्या’ असे म्हणण्यात मजा आहे आणि एका नव्या शब्दाचे स्वागतही किंवा ‘तो रागावून गेला’ यापेक्षा तो तनफन करत गेला असे म्हटले, की रागातला चढा पारा कळतो, त्यातला रागरंगही कळून येतोच..लोकभाषेत अर्थात, मराठी बोलीभाषेत अहो जाहोचा असा फारसा बडेजाव नसतो. अरे - तुरे केले तरी भागते. त्यात कुणाचा उपमर्द कुणाला म्हणून वाटत नाही. उलट, अशा भाषेतून आपुलकी आणि जवळिकताच जाणवत राहते. याउलट अगदीच पुस्तकी भाषेला खेड्यात नाटकी भाषा म्हणतात. शुद्ध म्हणवल्या जाणाऱ्या भाषेतून परकेपणा आणि दूरता हीच अधिक जाणवते. याचा अर्थ मराठीतील प्रमाणभाषेला मुळीच दूर सारावयाचे नाही. तथापि, लोकांच्या ओठातल्या आणि पोटातल्या भाषेला सर्वांनी आपलेपणाचा आधार द्यायला हवा हा यातला खरा हेतू आहे. .कारण गावातील लोक आणि शहरातील लोक यांच्यात संवाद-स्तरावर एकप्रकारचे भाषिक अंतर पडलेले बघायला मिळते. अर्थात हे अंतर का पडले, याचे उत्तर एका वाक्यात देता यावयाचे नाही. त्यासाठी पुस्तके आणि शिक्षण यांचा अभाव - प्रभाव हा नीट समजून दिला पाहिजे. नीट समजून घेतला पाहिजे. मूलतः या भाषेची दरीची समाज-लोक-शास्त्रीय समीक्षा आपण अजूनही अपेक्षित अशी केलेली आढळत नाही.९४२२७२१६३१(लेखक राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.