Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा आमरण उपोषण

Reservation for Maratha community : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी रणशिंग फुंकले आहे. त्यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरूवात करत सरकारकडे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Agrowon

Pune News : मराठा समाजासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत पुन्हा एकदा आमरण उपोषणाला शनिवारपासून (१० रोजी) सुरूवात केली आहे. ते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी, सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसह इतर मागण्यावरून सरकारने काढलेल्या आदेशाचे रूपांतर कायद्यात करावे असे म्हटले आहे. तसेच यासाठी आपला जीव गेला तरी चालेले पण एक इंच देखील मागे हटणार नाही. पण याची किंमत सरकारला चुकवावी लागेल असे मनोज जरांगे यांनी म्हटल आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे कुच करत सरकारला आपल्या मागण्या मनोज जरांगे यांनी मान्य करवून घेतल्या होत्या. त्यावेळी राज्य सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य करत आध्यायदेश काढला होता. मात्र त्यांची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : गुलाल घेऊन मराठे मुंबईतून परतले

यावरून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणास सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी, आज पासून उपोषण सुरु करतोय. मी, उपचार, पाणी अन्न घेणार नाही. तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असेही मनोज जरांगे पाटील म्हटले आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : 'या गुलालाची लाज राखा, अध्यादेशाला धक्का लागला तर...'; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

यावेळी मनोज जरांगे यांनी, सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी १५ तारखेला विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली आहे. तसेच सरकारने मराठा समाजातील तरूणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. याच्याआधी सरकारने यापेक्षाही भयानक गुन्हे मागे घेतले आहे. यामुळे सरकारच्या मनात आले तर काहीही होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत.

पुढे मनोज जरांगे म्हणाले की, माझे शरीर सध्या साथ देत नाही. मी याच्याआधीच माझ्या राज्याची भेट घेऊन आलो आहे. त्यामुळे एक इंचही मागे हटणार नाही. समाजासाठी मी मोठा नाही. पण सरकारने एका जीवाची किंमत करण्यापेक्षा समाजाचा विचार करावा. एक जीव गेला तरी चालेल” पण याची सरकारला किंमत चुकवावी लागेल. यामुळे सरकारने विशेष अधिवेशन बोलवून सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी. सरकारने हैदराबादचे गॅजेट अमंलात आणावे, अशीही मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com