Mumbai March Suspended Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (ता. १७) आपले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुंबईकडे जाणेही स्थगित केले. सरकारला तीन महिन्यांची मुदत देत, या काळात आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा मुंबई गाठण्याचा इशारा त्यांनी दिला..बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे मुक्कामी असताना जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर तपासणी करून वैद्यकीय उपचार करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीबाबत मराठा समाजात चिंता व्यक्त केली जात होती..Manoj Jarange Patil: उपोषण सोडणार नाही, मुंबईत जाणारच; मनोज जरांगे पाटलांची ठाम भूमिका.गुरुवारी पहाटे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि स्थानिक आमदार सुरेश धस यांचा समावेश असलेले सरकारी शिष्टमंडळ पाटोदा येथे दाखल झाले. .Manoj Jarange Patil: उपोषण सोडणार नाही, मुंबईत जाणारच; मनोज जरांगे पाटलांची ठाम भूमिका.शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली. सरकारच्या आश्वासनांनंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला..सरकारने मराठा आरक्षणाबाबत दिलेली आश्वासने तीन महिन्यांत पूर्ण करावीत. शब्द पाळला नाही, तर गाठ आमच्याशी आहे. त्यानंतर उपोषण न करता संपूर्ण मराठा समाज थेट मुंबईवर धडक देईल.- मनोज जरांगे पाटील.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.