
Ahilyanagar News : ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. या बाबत मात्र अधिकृत प्रवक्त्याने भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यावर बोलणे योग्य नाही. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितपणे लढविणार असल्याचे राज्याचे पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.
अहिल्यानगर येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, की भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीमध्ये प्रत्येकी दोन मंत्री आहेत. या समितीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेणार आहेत. राज्यात महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विकासकामांसाठी निधी वाटपात भेदभाव होणार नाही.
राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. त्यावर दोन्ही पक्षांच्या अधिकृत प्रवक्त्याने भूमिका स्पष्ट केल्यावर बोलणे उचित ठरेल. राजकारणात अनेक चर्चा सुरू असतात. लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंगचा आरोप करतात.
परंतु ज्या राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तेथे फिक्सिंगचा आरोप करत नाहीत. ईव्हीएम मशिन हॅक करता येत नाही. ईव्हीएमच्या अनुषंगाने दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम मशिन हॅक करता येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या पक्षाला जनतेने नाकारले, ते पक्ष ईव्हीएमवर आपल्या पक्षाच्या अपयशाचे खापर फोडतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.