Health Risks during Extreme Heatwave: राज्यात यंदा उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. उष्माघात, निर्जलीकरण आणि उष्णतेशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, १ मार्च ते १८ मे या कालावधीत राज्यात एकूण २१९ उष्माघाताचे रुग्ण आढळले असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी अकोला आणि लातूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे..राज्यातील अनेक भागांत एप्रिल आणि मे महिन्यांत तापमानाने ४३ ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र जाणवत असून, अकोला येथे यंदाच्या हंगामातील २६ एप्रिल रोजी राज्यातील सर्वाधिक ४६.९ कमाल तापमानाची नोंद झाली आहे. सलग वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास वाढला असून, रुग्णालयांमध्ये ताप, अशक्तपणा, चक्कर येणे, उलट्या, रक्तदाब कमी होणे आणि बेशुद्ध पडण्याच्या तक्रारींसह रुग्ण दाखल होत आहेत..Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता.विशेषतः शेतकरी, शेतमजूर, बांधकाम मजूर, वाहतूक क्षेत्रातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये उष्णतेचा परिणाम अधिक दिसून येत आहे. दुपारच्या वेळी शेतातील कामे करणाऱ्या मजुरांना उष्माघाताचा धोका वाढत असल्याने कृषी विभाग आणि आरोग्य विभागाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण छत्रपती संभाजीनगर येथे आढळले आहेत. येथे सध्या ३६ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांत तुलनेने अधिक रुग्ण आढळले आहेत..काही जिल्ह्यांत रुग्णसंख्या अत्यल्प असून, काही ठिकाणी एकही रुग्ण नोंदलेला नाही. दरम्यान, अहिल्यानगर आणि लातूर येथे प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच सोलापूर आणि अकोला येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक जिल्ह्यांत ‘हीट स्ट्रोक वॉर्ड’ तसेच विशेष उपचार कक्ष तयार ठेवण्यात आले आहेत..Maharashtra Heatwave: विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा.घ्यावयाची काळजीदुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.पुरेसे पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा ओआरएस घ्यावे.हलके, सैल आणि सुती कपडे वापरावेत.डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा.उन्हात काम करणाऱ्यांनी वेळोवेळी विश्रांती घ्यावी.उष्माघाताचा त्रास झाल्यास करावयाचे प्रथमोपचार.त्रास झालेल्या मुला-मुलीला लगेच घरात, सावलीत आणावे. त्यांचे कपडे सैल, ढिले करावेत. ओल्या पाण्याच्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात. उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे, जेणेकरून ते गुदमरून जाणार नाहीत. हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा. पायांखाली उशी किंवा तत्सम काही ठेवून त्यांना आडवे पडायला सांगावे. मूल जागे असल्यास वारंवार साफ आणि थंड पाण्याचे घोट पाजावेत. मूल बेशुद्ध असल्यास त्याला खायला, प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.