Nagpur News : राज्यातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचविणे, नुकसानग्रस्तांना न्याय देणे हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले..श्री. बावनकुळे गुरुवारी (ता. २५) नागपूर विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कालपर्यंत १७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे झाले असून, लवकरच यासंदर्भात शासन निर्णय निघेल..Crop Damage Compensation : दिवाळीपूर्वी मदत देण्याचा प्रयत्न असेल.शेतकऱ्यांना तातडीची मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिली जाणार आहे. घर पडलेल्यांना, जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत मिळणार आहे. आपत्ती व्यवस्थापन निधीतून वाटप सुरू झाले आहे. अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था (एनजीओ) आणि व्यावसायिकही मदतीसाठी पुढे येत आहेत..सोयाबीन पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी नमूद केले. नागपूर किंवा अमरावतीमध्ये झलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मी स्वतः जाणार आहे. त्याचे पंचनामे आम्ही करणार आहोत. .Crop Damage Compensation : हिंगोली जिल्ह्यासाठी २३५ कोटी मंजूर.शेतकरी संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठविला जाईल. केंद्र सरकारकडूनही मदत मिळेल, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. .आमच्या आमदारांनी एक महिन्याचे मानधन मदतनिधीस देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या मागण्यांवर प्रतिक्रिया देताना श्री. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मागण्या माध्यमांमार्फत न करता लेखी स्वरूपात आमच्याकडे केल्यास विचार केला जाईल..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.