Maharashtra Farmer Loan Waiver Assembly Debate : राज्य सरकारने २०१९ च्या कर्जमाफीची अट घातल्याने १२ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना यंदाच्या कर्जमाफीपासून वंचित राहावं लागत आहे, असा आक्षेप शिवसेना उबाठाचे आमदार कैलास पाटील यांनी घेतला. त्यावर सरकारची बाजू मांडत कर्जमुक्ती योजनेच्या अटी जुन्याच असल्याचा दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केला.