Pune News: मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसाठी रब्बीचे हेक्टरी १० हजार अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. नुकसानग्रस्त ४४ लाख ८६ हजार हेक्टरसाठी अनुदान मंजूर झाले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ४ हजार ४८६ कोटी रुपयांचे रब्बी अनुदान वाटप करण्यास सरकारने मंगळवारी मंजुरी दिली. .मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या काळात अतिवृष्टीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी राज्य सरकारने एनडीआरएफच्या मदतीव्यतिरिक्त रब्बीच्या पेरणीसाठी हेक्टरी १० हजार रुपये अनुदान मंजूर केले होते. वेगवगेळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आता अनुदान मंजूर करत आहे. विदर्भातील १० जिल्ह्यांसाठी १७६४ कोटी वाटपास मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांसाठी ४ हजार ४८६ कोटी रुपये अनुदान वाटपास मंजुरी दिली आहे. .Rabbi Anudan GR: विदर्भासाठी २२६४ कोटींचे रब्बी अनुदान मंजूर; यवतमाळ जिल्ह्याला सर्वाधिक ६३८ कोटी मिळणार.छत्रपती संभाजीनगर जिल्हाछत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात ६ लाख ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या क्षेत्रासाठी ६०८ कोटी ९५ लाख रुपये रब्बी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या जिल्ह्यातील ६ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. .हिंगोली जिल्हाहिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३४१ कोटी २८ लाख रुपये अनुदान वाटप होणार आहे. २ लाख ९७ हजार शेतकऱ्यांना ३ लाख ४१ हजार हेक्टरसाठी हे अनुदान मिळणार आहे. .Rabbi Anudan GR : रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांचा शासन निर्णय जारी; मदत कोणत्या जिल्ह्यांसाठी?.नांदेड जिल्हानांदेड जिल्ह्यातील ७ लाख ८० हजार शेतकऱ्यांना ७ लाख २७ हजार हेक्टरसाठी अनुदान मंजूर झाले आहे. या शेतकऱ्यांना ७२७ कोटी ९३ लाख रुपये मिळणार आहेत. .बीड जिल्हाबीड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांमध्ये ७ लाख ८ हजार हेक्टरचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी ७ लाख ३७ हजार शेतकऱ्यांना ७०८ कोटी रुपये रब्बी अनुदान वाटप होणार आहे..Rabbi Anudan: ३० हजारांपर्यंत कमाल अनुदानाच्या जीआरमध्ये चलाखी काय?.जालना जिल्हाजालना जिल्ह्यातील ६ लाख २१ हजार शेतकऱ्यांना ४६१ कोटी ५१ लाख रुपये रब्बी अनुदान वाटपास मंजुरी मिळाली आहे. या शेतकऱ्यांच्या ४ लाख ६१ हजार हेक्टरसाठी हे अनुदान वाटप होणार आहे. .धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील ५ लाख ६ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त ५ लाख ७७ हजार हेक्टरसाठी ५७७ कोटी ५४ लाख रुपये अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. .लातूर जिल्हालातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ५६५ कोटी ५८ लाख रुपये अनुदान वाटपास मंजुरी देण्यात आली आहे. या जिल्ह्यातील ५ लाख १९ हजार शेतकऱ्यांना ५ लाख ६५ हजार हेक्टरसाठी हे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. .परभणी जिल्हापरभणी जिल्ह्यातील ४ लाख ३९ हजार शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त ४ लाख ९५ हजार हेक्टरसाठी अनुदान मंजूर झाले आहे. या शेतकऱ्यांना ४९५ कोटी रुपये अनुदान वाटप होणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.