Water Shortage : सुप्यातील तलावात अत्यल्प साठा

Water Crisis : सध्या टंचाईस्थितीमुळे सरकारने टंचाईमधून जनाईद्वारे सुपे तलावात पाणी सोडण्याची मागणी सरपंच तुषार हिरवे यांनी केली आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Baramati News : सुपे (ता. बारामती) येथील गावठाण तलावावरून सुपे, चांदगुडेवाडी, काळखैरेवाडी गावांसाठी नळपाणी पुरवठा होतो. तर लगतच्या १०-१५ गावांना टँकर येथूनच भरले जातात. परंतु, या तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असल्याने जनाई उपसा जलसिंचन योजनेद्वारे टंचाईमधून तातडीने पाणी सोडण्याची येथील ग्रामस्थांची मागणी आहे.

सुपे तलावात याआधी पैसे भरून पाणी घेतले होते. येथून अनेक गावांना पाणीपुरवठा होत आहे. सध्या टंचाईस्थितीमुळे सरकारने टंचाईमधून जनाईद्वारे सुपे तलावात पाणी सोडण्याची मागणी सरपंच तुषार हिरवे यांनी केली आहे. याविषयी तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे त्यांनी मागणी केल्याची माहिती दिली.

Water Crisis
Water Shortage : पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

ते म्हणाले ‘‘सुपे गावठाण तलावातून १० ते १५ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे. मोरगाव, आंबीखुर्द, आंबीबुद्रुक, भोंडवेवाडी या गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा वाहिनीही सुपे तलावातील चांदगुडेवाडीसाठीच्या नळ पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरून सुरू करण्यात आली आहे.

Water Crisis
Water Shortage : वाढत्या उन्हासोबत प्रकल्पांतील साठ्यात घट

तसेच, याच तलावातून सुपे, चांदगुडेवाडी, काळखैरेवाडीसाठी नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे तलावातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, तलावातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. जनाई योजनेद्वारे पाणी लवकर आले नाही तर अवघ्या आठ दिवसात तलावातील पाणीसाठा संपेल अशी आजची स्थिती आहे.

नियमीत पुरवठ्याची गावकऱ्यांची मागणी

सध्या सुपे गावात ५ ते ८ दिवसातून एकदा नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. सुपे तलावातून दररोज लगतच्या अनेक गावांना पाणीपुरवठा होतो. असे असताना सुपेकरांनाच पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ यावी अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. तलाव उशाला अन् कोरड घशाला अशी येथील स्थिती आहे.

पाण्याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्या आहेत हे खरे आहे. परंतु, तलावातील विहिरीतून, तसेच, एका खासगी विहिरीतून नळपाणी पुरवठ्यासाठी पाणी घेत आहोत ते कमी पडते. त्यातच अनेकदा वीज खंडित होत असल्याने पाणी पुरवठ्यात व्यत्यय येतो.
- तुषार हिरवे, सरपंच, सुपे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com