Climate Change Impact: शहरात वाढत्या उन्हाच्या तडख्यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. याचा फटका मानवाप्रमाणेच पशुधनालाही बसत आहे. वातावरणातील या बदलांमुळे जनावरे आजारी पडण्याची शक्यता अधिक असल्याने राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर आणि कुक्कुटपालन व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत असल्याने पशुपालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे..वसई-विरारमध्ये फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, तापमानातील सततच्या चढ-उतारामुळे गायी, म्हशी, शेळ्या या प्राण्यांसह पक्ष्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनावरांच्या शरीरातील पाणी आणि क्षारांचे प्रमाण कमी होऊन निर्जलीकरणाचा धोका निर्माण होऊ शकतो. .Animal Crop Damage Issues: मोकाट जनावरांचा धसई परिसरात उच्छाद.जनावरांना धाप लागणे, श्वासाचा दर वाढणे, नाकपुड्या कोरड्या पडणे, लाळ गाळणे आणि चारा खाण्यात घट होणे अशी लक्षणे दिसल्यास तो उष्णतेचा परिणाम समजावा, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वसईतील आर्द्र हवामानामुळे जनावरांना अधिक अस्वस्थता जाणवू शकते, ही बाबही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे प्राण्यांना दुपारच्या वेळी विश्रांती देणे, दुभत्या जनावरांना सकाळी लवकर आणि रात्री उशिरा संतुलित आहार देणे, त्यांच्या आहारात क्षार मिश्रण आणि जीवनसत्वांचा वापर वाढवणे, वाढत्या उष्णतेचा परिणाम दूध उत्पादनावर होऊ नये, .Summer Livestock Care: जनावरांमधील उष्माघाताची कारणे आणि लक्षणे कोणती?.यासाठी सायंकाळच्या दूध काढण्याच्या वेळा किमान एक तास उशिराने ठेवणे, सकाळी लवकर आणि संध्याकाळी ऊन कमी झाल्यावर त्यांना चरण्यासाठी सोडणे, मुबलक आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावेत. शक्य असल्यास गोठ्यावर गवताचे किंवा नारळाच्या झावळ्यांचे आच्छादन करावे. म्हैस वर्गीय जनावरांना स्वच्छ पाण्याच्या हौदात बसण्याची सोय करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत..कुक्कुटपालकांसाठी सूचनापक्ष्यांची रोगप्रतिकारकशक्ती उष्ण हवामानामुळे कमी होत असल्याने या काळात डायरिया व राणीखेत, देवी यासारखे जिवाणूजन्य व विषाणूपासून होणारे रोग होऊ शकतात. तसेच पक्षांचे खाणे कमी होऊन उत्पादन क्षमतेत घट होऊ शकते. यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांनी नुकसान टाळण्यासाठी उष्णता परावर्तित करण्यासाठी पक्षीगृहाच्या छतावर पांढऱ्या चुन्याचा लेप लावावा, पक्ष्यांना नेहमी लागणाऱ्या जागेपेक्षा जवळपास २० ते ३० टक्के जागा वाढवून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे..वसईतील वाढत्या तापमानामुळे पशुधनाला त्रास होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पशुपालकांनी प्राण्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्राण्यांमध्ये उष्माघाताची कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.- डॉ. नकुल कोरडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, वसई.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.