Solapur News: मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे लिंबाचे दर ढासळले. त्यामुळे आंबिया बहाराच्या या लिंबांतून मिळणारे एकरी किमान पन्नास हजार ते दोन लाख रुपयांचे लिंबू बागायतदारांचे नुकसान झाले. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर हिटमुळे मृग बहाराच्या फळांना चांगला दर मिळण्याची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी यंदा निराशाच पडली. .गेल्या सात महिन्यापासून लिंबाचे दर प्रतिकिलो १० ते १५ रुपयांदरम्यान असल्याने खर्चही निघणे कठीण झाले आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात लिंबाच्या बागांना पाण्याचा ताण मिळणे आवश्यक असताना, पाऊस जास्त झाल्याने लिंबाच्या बागांना पुरेसा ताण मिळाला नाही. .Citrus Management: संत्रा फळाची विक्री पूर्व प्रक्रिया कशी करावी?.त्याचा परिणाम हस्त बहार निघण्यावर झाला आहे. अत्यल्प प्रमाणात फूल धारणा झाल्याने मार्च आणि एप्रिल महिन्यात लिंबाच्या दरात तेजी राहील, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. डिसेंबर-जानेवारीत आंबिया बहार जास्त निघाल्यास मे महिन्यात दर कमी होतील..या वर्षी जास्त पावसाने लिंबाचे नियोजन पूर्ण ढासळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अंकोलीसह परिसरातील शेजबाभूळगाव, औंढी, वरकुटे, टाकळी सिकंदर आणि पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली या गावात लिंबू बागायतदारांची संख्या मोठी आहे. वर्षभर लिंबाचे कमी-अधिक प्रमाणात उत्पन्न सुरू असते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.