Pune News: राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना दरमहा १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाते. अलीकडेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नेमकी आकडेवारी किती? याबाबतची सविस्तर माहिती आता समोर आली आहे..'टाईम्स ऑफ इंडिया'च्या ताज्या अहवालानुसार, या योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी तब्बल ८३ टक्के महिला विवाहित आहेत. म्हणजेच घरातीलसंसाराचा गाडा ओढणाऱ्या महिलांनी या योजनेला सर्वाधिक पसंती दिली आहे. विवाहित महिलांसोबतच ११.८ टक्के अविवाहित तरुणी देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. तसेच, पतीचे छत्र हरवलेल्या विधवा महिलांचे प्रमाण ४.७ टक्के आहे, तर घटस्फोटीत महिलांचे प्रमाण १ टक्क्यापेक्षाही कमी म्हणजेच ०.३% असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे..Ladki Bahin Yojana: फेब्रुवारी महिन्याचा १ हजार ५०० रुपयांचा हप्ता अजून नाही! दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळणार ?.तरुण आणि मध्यमवयीन महिला आघाडीवरतसेच, वयोगटानुसार विचार केला असता, तरुण आणि मध्यमवयीन महिलांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. २१ ते ३९ या वयोगटातील महिला लाभार्थी या योजनेत सर्वाधिक आहे. या वयोगटातील एकूण ७८ टक्के महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यातही ३० ते ३९ वयोगटातील २९ टक्के महिला सर्वाधिक लाभार्थी ठरल्या आहेत. हा वयोगट योजनेचा सर्वात मोठा 'लाभार्थी गट' ठरला आहे. तसेच, २१ ते २९ वयोगटातील २५.५ टक्के तर ४० ते ४९ वयोगटातील २३.६ टक्के महिला पात्र ठरल्या आहेत. याउलट ६० ते ६५ वयोगटातील ज्येष्ठ महिलांचे प्रमाण केवळ ५ टक्के इतके कमी आहे..पुणे जिल्हा नंबर १, तर गडचिरोली पिछाडीवरया योजनेच्या लाभार्थींचा भौगोलिकदृष्ट्या विचार केला असता, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यानंतर नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. तर, सर्वात कमी लाभार्थी असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोकणातील सिंधुदुर्ग आणि विदर्भातील दुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.".Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’च्या १२५०० लाभार्थी.पडताळणीनंतर १ कोटी अर्ज अपात्रदरम्यान, या योजनेच्या सुरुवातीला अडीच कोटी महिलांचे अर्ज मंजूर झाले होते. परंतू, सरकारकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जात असल्याने, निकषात न बसणाऱ्या १ कोटीहून अधिक महिलांचे अर्ज प्रशासनाने छाननीनंतर रद्द केले आहेत. तसेच, या योजनेत कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असणे, वयोमर्यादा २१ ते ६५ बाहेर असणे, किंवा एका कुटुंबातून दोनपेक्षा जास्त अर्ज येणे, या कारणांमुळे हे अर्ज फेटाळले आहेत. सुधारित नियमांनुसार, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येतो, ज्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला असणे अनिवार्य आहे..१ कोटीहून अधिक महिलांचे अर्ज अपात्रयात विवाहित महिलांसोबतच अविवाहित तरुणींचाही मोठा सहभाग दिसून येत आहे. या योजनेच्या सुरुवातीला अडीच कोटी महिलांचे अर्ज मंजूर झाले होते; मात्र कागदपत्रांच्या कडक पडताळणी आणि निकषांची अंमलबजावणी केल्यानंतर १ कोटीहून अधिक महिलांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.