Farmer Protest: अतिवृष्टी, अपुरी मदत आणि रखडलेली कर्जमाफीसाठी किसान सभेचे २२ ऑक्टोबरला राज्यव्यापी आंदोलन
Akhil Bhartiya Kisan Sabha: राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सरकारकडून अद्याप पुरेशी मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेने बलिप्रतिपदेच्या दिवशी, बुधवार (ता. २२) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.