Compensation Waiting: खानदेशात गेल्या १० ते १२ दिवसांत झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे केळीसह भाजीपाला, शेडनेट, पॉलीहाऊस तसेच घरगोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे..धुळे, जळगाव, भुसावळ, साक्री आदी भागांत शेडनेट आणि पॉलीहाऊसचे नुकसान झाले आहे. मात्र अशा संरचनांच्या नुकसानीचे मूल्यांकन कसे करावे, भरपाईची टक्केवारी कशी निश्चित करावी, याबाबत स्पष्ट धोरण नसल्याने कृषी यंत्रणेसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अल्प नुकसान झालेल्या पॉलीहाऊसलाही दुरुस्तीसाठी वेळ आणि खर्च करावा लागत असल्याने भरपाईचे निकष पुनर्निश्चित करण्याची मागणी होत आहे. अनेक भागांत शेडनेट व पॉलीहाऊसच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत..Crop Damage Survey: वादळी पावसातील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा : भरणे.खानदेशातील केळी पिकालाही मोठा फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे केळीची पाने फाटली असून, त्याचा उत्पादनावर ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत परिणाम झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. मात्र पाने फाटल्याने झालेले नुकसान प्रशासन किंवा विमा कंपन्यांकडून विचारात घेतले जात नसल्याची तक्रार आहे..Crop Damage Survey: नुकसानीचे नव्याने पंचनामे करून मदत देणार.खानदेशात सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, यावल, जामनेर, पाचोरा तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा, अक्कलकुवा आदी भागांत केळी बागांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी केळीबागा पूर्णपणे आडव्या झाल्या असून, तेथे शंभर टक्के नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे..फळपीक विमा योजनेअंतर्गत भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या ॲपवर नुकसानीची पूर्वसूचना दिली आहे. मात्र विमा कंपनीकडून प्रत्यक्ष पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कृषी विभागाच्या माहितीनुसार काही भागांतील पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे. जळगाव, यावल आणि रावेर तालुक्यांत केळीचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे..पंचनाम्यांची मागणी बेदखलअनेक भागांत पंचनाम्यांची मागणी करूनही कृषी विभाग किंवा महसूल यंत्रणा वेळेवर पोहोचत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. कृषी सहायक आणि तलाठी यांची कमतरता असल्याने पंचनाम्यांचे काम संथ गतीने सुरू आहे. केळीबागा जमीनदोस्त झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांना घड आणि खांब हटवून शेत स्वच्छ करण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. त्यानंतरच खरिपाच्या पेरण्या करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.