Khandesh Water Storage : खानदेशात जलसाठा वाढू लागला

Girna Dam Water Level : गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आहे. पण या धरणाचा लाभ जळगाव जिल्ह्यास अधिक आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा किंचित वाढला असून, हा साठा सुमारे ३५ टक्के एवढा आहे. गिरणा धरणातील साठा ४७ टक्के एवढा झाला आहे. जलसाठा काहीसा वाढल्याने दिलासा मिळाला आहे.

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये आहे. पण या धरणाचा लाभ जळगाव जिल्ह्यास अधिक आहे. जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमधील अनेक गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी या धरणातून पाणी सोडले जाते. तसेच रब्बीत २१ हजार हेक्टरला लाभ मिळतो.

या धरणातून तीनदा नदीत पाणी सोडले आहे. तर रब्बीसाठीदेखील तीनदा आवर्तन सुटले होते. धरणाची साठवण क्षमता १८ टीएमसी एवढी आहे. हे धरण गेल्या वर्षी १०० टक्के भरले होते. यामुळे धरणातील पाण्याचा चांगला लाभ गिरणा काठच्या गावांना झाला आहे. पण सद्यःस्थितीत धरणात बुधवारी (ता.९) सकाळी पाटबंधारे विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार ४७ टक्के जलसाठा आहे.

Water Storage
Mula Dam Water Storage : मुळा धरण पन्नास टक्के भरण्याच्या मार्गावर

तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) धरणातील जलसाठा यंदाही १०० टक्के राहील. त्यातून सध्या जलसाठा नियंत्रणासाठी नदीत पाणी सोडले जात आहे. तापी नदी प्रवाही आहे. पण या धरणात ५५ टक्के गाळ असल्याने जलसाठा झपाट्याने घटतो. हतनूरमधून तीनदा रब्बीसाठी आवर्तन सुटले आहे.

तसेच दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत व नदीकाठच्या गावांमधील टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाते. जामनेरातील वाघूर धरणाची साठवण क्षमता आठ टीएमसी आहे. यातही सुमारे ६५ टक्के जलसाठा आहे.

Water Storage
Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

या धरणातून जामनेर शहर, जळगाव शहर व औद्योगिक वापरासाठीदेखील पाणी दिले जात आहे. खानदेशात धुळ्यातील साक्रीमधील जामखेली प्रकल्प भरला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेरातील मंगरूळ, अभोडा, यावलमधील सुकी, मोर, हरिपुरा, वड्री प्रकल्प, नींबादेवी प्रकल्पातील जलसाठाही वाढला आहे.

नंदुरबारातील जलसाठा स्थिर

नंदुरबारातील चिरडे, दरा, सुसरी, देहली आदी प्रकल्पांतील जलसाठा फारसा वाढलेला नाही. पण त्यातील जलसाठा स्थिर आहे. नंदुरबारातील शहाद्यातील तापी नदीवरील प्रकाशा व सारंगखेडा बॅऱेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीला मागील १५ दिवसांपासून प्रवाही पाणी आहे. पण चाळीसगावातील मन्याड, जामनेरातील तोंडापूर आदी प्रकल्पांतील जलसाठा चिंताजनक स्थितीतच आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com