Agricultural Labour Issue: खानदेशातील शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामानंतर आता खरीपपूर्व काळातही मजूरटंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या पेरणीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू नसली तरी केळी लागवड, तणनियंत्रण, फवारणी, खत व्यवस्थापन आणि इतर शेतीकामांसाठी मजुरांची मागणी वाढली असून अनेक भागांत मजूर अपुरे पडत आहेत..मागील रब्बी हंगामातही अशीच परिस्थिती होती. गेल्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे तणनियंत्रण, फवारणी, काढणी आणि मळणीची कामे विस्कळित झाली होती. सणासुदीच्या काळातही शेतकऱ्यांना शेतातील कामे सुरू ठेवावी लागली होती. यंदाही अनेक भागांत पूर्वहंगामी पिकांच्या व्यवस्थापनाची कामे वेगाने सुरू असून वेळेत कामे न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे..Labour Shortage Issue: कुशल कामगारांअभावी नाईक सूतगिरणी तोट्यात.सध्या केळी आणि पपई बागांमध्ये तणनियंत्रण, फवारणी आणि खत देण्याची कामे सुरू आहेत. काही भागांत पूर्वहंगामी कापूस पिकातील तण काढण्याचे कामही सुरू असल्याने मजुरांची मागणी वाढली आहे. परिणामी अनेक गावांमध्ये मजूरटंचाई प्रकर्षाने जाणवत आहे..Labour Shortage Issue: मजूर टंचाईवर यांत्रीकरणातून मात.सातपुडा भागातील मजुरांचा काहीसा दिलासासातपुडा पर्वतरांगांतील काही मजूर खानदेशात दाखल झाल्याने काही भागांत परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र पाचोरा, जामनेर, पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव आणि जळगाव परिसरातील अनेक गावांमध्ये मजुरांची कमतरता कायम आहे..चोपडा, यावल, रावेर, तापीकाठचा जळगाव जिल्ह्याचा भाग, नंदुरबारमधील शहादा व तळोदा तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर परिसरात शेतीमजुरांची मागणी अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अन्य भागांतून मजूर आणावे लागत असून फवारणी व इतर कामांसाठी शोधाशोध करावी लागत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.