Pune News: दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या सिनेअभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचा अपमान आणि देशद्रोहाच्या आरोपाखाली आता कंगना यांच्यावर उत्तर प्रदेशातील आग्रा येथे खटला चालवला जाणार आहे. बुधवारी (ता.१२) झालेल्या सुनावणीत आग्रातील खासदार-आमदार प्रकरणांसाठीच्या विशेष न्यायालयाने कंगनाविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका स्वीकारली. या याचिकेवर २९ नोव्हेंबर रोजी सुनावणी करण्यात येणार आहे..या प्रकरणी सुनावणी करताना विशेष न्यायाधीश लोकेश कुमार यांनी सांगितले की, ज्या कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वी कंगनाविरुद्धचा खटला फेटाळला होता, त्याच कनिष्ठ न्यायालय आता पुन्हा खटल्याची सुनावणी करण्यात येईल. तसेच कंगनावर आता भारतीय दंड संहितेच्या कलम ३५६ आणि १५२ अंतर्गत खटला चालवला जाईल. असेही स्पष्ट केले आहे..Kangana Ranaut : रद्द केलेले ३ कृषी कायदे परत आणा, खासदार कंगना रणौतचे वादग्रस्त वक्तव्य; भाजपचे स्पष्टीकरण, काँग्रेसचा टोला.याचिका का?अधिवक्ता रामशंकर शर्मा यांनी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्याचा दावा केला आहे. तसेच कंगना यांच्या विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान झाला आहे, असा आरोप केला आहे. शर्मा यांनी ११ सप्टेंबर २०२४ रोजी कंगना यांच्या विरुद्ध देशद्रोहाची याचिका दाखल केली. या याचिकेत कंगना यांनी २६ ऑगस्ट २०२४ रोजी एका मुलाखतीत शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली, ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे..Rahul Gandhi And SKM On Kangana Ranaut : कंगनाच्या शेतकरी आंदोलनाच्या वादग्रस्त वक्तव्याला राहुल गांधींचे प्रत्युत्तर; कंगनाने माफी मागावी, संयुक्त किसान मोर्चाची मागणी .प्रकरण काय?शर्मा म्हणाले की, २७ ऑगस्ट रोजी त्यांनी एका वर्तमानपत्रात कंगना यांचे विधान वाचले, ज्यामध्ये तिने म्हटले होते की, "ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२१ पर्यंत शेतकरी काळ्या कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत होते. त्या काळात बलात्कार आणि हत्या झाल्या. जर देशाचे नेतृत्व मजबूत नसते तर देशातील परिस्थिती बांगलादेशसारखी झाली असती." तसेच या विधानात शेतकऱ्यांना 'खूनी, बलात्कारी, दहशतवादी आणि अतिरेकी' म्हणून चित्रित केल्याचे शर्मा यांनी सांगितले. यावरूनच ३१ ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्त आणि नवीन आग्रा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे..दरम्यान, यापूर्वी कंगना यांनी शेतकरी आंदोलनावर टीका केली होती. सोशल मिडीयावर पोस्ट करून आंदोलक शेतकऱ्यांची खलिस्तान्यांशी तुलना केली होती. कंगना यांच्या या विधानावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.