Parbhani News: बदलत्या हवामान स्थितीत जमिनीचे मूलभूत नैसर्गिक गुणधर्म जतन करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने संशोधन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी केले. .वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयातील मृद विज्ञान विभाग आणि भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या परभणी शाखेतर्फे जागतिक मृदा दिनी शुक्रवारी (ता. ५) डॉ. डी. के. पाल स्मृती व्याख्यानमालेत डॉ. भट्टाचार्य यांचे बदलत्या हवामानाचा जमिनीच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम या विषयावर ऑनलाइन व्याख्यान झाले..Agriculture Research: संशोधन पोहोचविण्यासाठी प्रभावी विस्तार कार्य हवे.अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा हे ऑनलाइन उपस्थित होते. माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव संतोष वेणीकर, .Agricultural Research Funds: कृषी संशोधन निधीचे २०० कोटींचे प्रस्ताव पडून .सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर आदीची मंचावर उपस्थिती होती. .डॉ. इंद्रमणी म्हणाले, की उत्पादकतेसाठी सेंद्रिय पदार्थांचा वापर, निविष्ठांचा काटेकोर वापर आवश्यक आहे. मृद विज्ञान, कृषी अभियांत्रिकी व कृषिविद्या शाखांमधील समन्वयातून संशोधनाच्या दिशा ठरवून नवनवीन शोध शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.