Chhatrapati Sambhajinagar News: उत्पादन खर्च कमी करून पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी संतुलित पीक पोषण आणि एकात्मिक खत व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी रासायनिक खतांचा अतिवापर टाळून जैविक, सेंद्रिय आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ऊससंशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले..महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत कृषी महाविद्यालय, खंडाळा येथे आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी मधमाश्यांची संख्या वाढवण्यासाठी तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढवणे देखील पर्यावरणाच्या दृष्टीने कसे आवश्यक आहे, यावर विशेष भर दिला. .Soil Health: खतांच्या संतुलित वापरातून होईल जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत .या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, वैजापूरचे उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के, प्रख्यात भुईमूग उत्पादक मधुकरराव घुगे आणि देवगिरी तेल उत्पादक श्रीमती लक्ष्मीताई खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. कौसडीकर यांनी बीजप्रक्रिया, विद्राव्य खते, तेलबिया पेंडी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर करण्याबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन केल्यास जमिनीचा पोत सुधारतो, असे त्यांनी सांगितले..Soil Health: जमिनीची काळजी घ्या, जमीन पिकाची काळजी घेईल.तेलबिया व प्रक्रिया उद्योग याविषयी डॉ. एस. बी. पवार यांनी विविध खाद्यतेल पिकांच्या लागवड तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. श्री. घुगे यांनी भुईमूग उत्पादनातील अनुभव कथन केले, तर श्रीमती लक्ष्मीताई खंडागळे यांनी तेल उत्पादन व्यवसायातील संधींविषयी माहिती दिली..शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद या सत्रात वैजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मोसंबी, अद्रक, कांदा, फळझाडे आणि भाजीपाला पिकांमधील पोषण व कीड व्यवस्थापनाबाबत प्रश्न विचारले. तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी प्रयोगांच्या आधारे शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे समाधान केले.कार्यक्रमाच्या शेवटी, शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या विविध सेवा आणि निविष्टींचा लाभ घेण्यासाठी विद्यापीठाच्या सातत्याने संपर्कात राहावे, असे आवाहन करण्यात आले..या कार्यशाळेस वैजापूर व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी अजून अद्रक व मोसंबी वर स्वतंत्र मार्गदर्शनाची मागणी केली. २१ व २२ रोजी आयोजित कृषी महोत्सवात २२ मार्च रोजी या दोन्ही विषयांवर डॉ. हरिहर कौसडीकर यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले असल्याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी यांनी माहिती दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.