Economists Warning About India's Economy: देशाची अर्थव्यवस्था बिकट अवस्थेतून जात असल्याची टीका सत्ताधारी पक्षाचे टीकाकारच नाही तर मोदी राजवटीचे अनेक वर्षांचे खंदे समर्थक अर्थतज्ज्ञही करू लागले आहेत.अर्थव्यवस्थेत मंदीसदृश परिस्थिती तयार झाली की पहिला फटका अनौपचारिक क्षेत्राला बसतो. पण सरकार दरबारी मागण्या तर संघटितपणे करू शकतो. .ज्या क्षेत्रात, ज्या ठिकाणी संघटित मागण्यासाठी कार्यकर्ते, नेते पुढाकार घेत आहेत त्यांना साथ द्या. कारण शासनाकडे अमर्याद ताकद असते. वित्तीय स्रोत असतात. कायदे, योजना फक्त शासनच बनवू शकते..समांतर पद्धतीने आपण स्वतःपुरते काय करू शकतो, असा प्रश्न स्वतःला विचारावयास हवा. कारण जगायचे तर आहे. मुलाबाळांचे भविष्य आहे. सर्व प्रथम अत्यावश्यक खर्च कुठले व कोणते खर्च पुढे ढकलू शकतो हे कुटुंबात एकमताने ठरवा. नवरा, बायको, मोठी मुले यांना विश्वासात घ्या..Agricultural Economy: शेतीत परतणारी पावले : अर्थव्यवस्थेपुढे धोक्याची घंटा.कोणत्याही परिस्थितीत, होताहोइस्तो खाण्याची सकसता कमी करू नका. दूध, अंडी, परवडेल तसा मांसाहार, भाजीपाला कमी करू नका. पैसे कमी झाले आहेत म्हणून निकृष्ट, स्वस्तातील अन्न खाणे आत्मघातकी सिद्ध होते; रोग प्रतिकारशक्ती कमी होते, मानसिक तणाव टाळता येत नाहीत, आजारी पडू शकतात. आरोग्यदायी शरीर हा तुमच्या हातातील एकमेव अॅसेट आहे, त्याची काळजी घ्या..आपले उत्पन्न कमी झाले आहे तर आपल्या बचतीवर व्याज मिळवूया, हा विचार मनात येणारच. पण त्या विचाराने अवाजवी व्याजदर देणाऱ्या योजनेत / कंपनीत / बँकेत / पतपेढीत तुमच्या ठेवी ठेवण्याचा मोह झाला तर तो निग्रहाने टाळा. दर महिन्याला पाच टक्के, सहा महिन्यांत दुप्पट अशा कोणत्याही वाटेला जाऊ नका. जास्त व्याज देणारी म्हणजे जास्त जोखीमवाली गुंतवणूक. व्याज कमी मिळाले तरी चालेल; मुद्दल सुरक्षित राहणे सर्वांत महत्त्वाचे; जेथे तुम्ही आधीच बचती ठेवल्या आहेत तेथे गडबड होऊ शकते असे वाटले तर ठेवी काढून घ्या..स्टॉक मार्केटने गेल्या काही महिन्यांत चांगला परतावा दिला आहे. तुम्हाला देखील चार पैसे मिळाले असतील. पण शेअरबाजार असा सरळ रेषेत आकाशापर्यंत जात नसतो. जागतिकीकरणामुळे भारताच्या बाहेर घडणाऱ्या आर्थिक / बिगर आर्थिक घटना आपला शेअरबाजार कोसळवू शकतात..पैसे कमी आहेत म्हणून साहजिकच कर्ज काढावे लागेल कदाचित. होईल तोपर्यंत कर्ज काढणे टाळा; घ्यावे लागले तर अल्पमुदतीचे न घेता जेवढे दीर्घकालीन मिळेल ते बघा. अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारणाऱ्या खासगी सावकाराकडे काही करून जाऊ नका; गृहकर्ज काढले असेल तर त्यावर ‘टॉप अप’ कर्ज मिळते का पाहा..दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत असतात. मुलांचे वर्ष बुडू नये म्हणून पैसे उभे करावे लागतील, कुटुंबातील कोणी गंभीर आजारी पडला तर इस्पितळात न्यावा लागेल आणि अशा आपत्कालीन परिस्थितीत कर्ज घ्यावेच लागणार. अशा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीत लागणाऱ्या कर्ज काढण्यासाठी जागा ठेवा..Indian Economy: मार महागाईचा!.मंगळसूत्र, ज्यात भावनिक गुंतवणूक आहे असे दागिने सोडून सोन्याचा एखादा छोटा-मोठा दागिना वेळ पडली तर मोडा. चांगला भाव मिळेल हे पहा. चार ठिकाणी चौकशी करून ठरवा. दिवस बदलल्यावर तो दागिना भविष्यात देखील करता येईल. दागिने आपल्यासाठी आहेत आपण दागिन्यांसाठी नाही..थोडे विरोधाभासी वाटेल. पण जमतील तशा छोट्या छोट्या बचती करा. स्त्रियांना हे कौशल्य पिढ्यान् पिढ्या माहीत आहे. ज्यावेळी कर्जासाठी कोणी दारात उभे करत नव्हते त्या अनेक दशकांच्या काळात स्त्रिया पैसे लपवून लपवून बचती करून अडीनडीला काहीबाही सोय करतच होत्या की. ते शहाणपण माळ्यावरून खाली काढा. तुमच्या हक्काचे थोडे का होईना पैसे हातात असणे महत्त्वाचे असेल या काळात..पुरुषांनी दारू आणि तत्सम व्यसनांच्या आहारी जाऊ नये; आत्महत्येचे विचार घोंघावत असतील तर त्यांना पिटाळून लावा. एकटे एकटे राहू नका. जास्तीत जास्त वेळ आपली बायको, मुले, कुटुंबीय, मित्र, आप्तेष्ट यांच्यामध्ये राहा. काही गोष्टी भविष्यावर सोपवा. तुमची तुमच्या कुटुंबाची होत असलेली परवड सिस्टिममुळे आहे. त्याचा अपराध गंड बाळगू नका. स्वतःचे, कुटुंबाचे शारीरिक, मानसिक आरोग्याला कमीत कमी आच लागेल हे बघा.(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.