MSP Wheat Procurement: रब्बी विपणन हंगाम २०२६-२७ मध्ये देशभरात गव्हाच्या खरेदीत वाढ झाली आहे. चालू हंगामात सरकारने २१ मे पर्यंत ३३३.९ लाख टन गहू खरेदी केला आहे. ही खरेदी यंदाच्या उद्दिष्टापेक्षा सुमारे १० लाख टनांनी कमी आहे. यंदा हमीभावाने ३४५ लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर आतापर्यंतची ही खरेदी गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २९६.४ लाख टन गहू खरेदी करण्यात आला होता. .गेल्या वर्षी सरकारने ३०० लाख टन गव्हाची खरेदी केली होती. पण यंदा १,२०२ लाख टन इतक्या उच्च उत्पादनाचा अंदाज असल्याने खरेदीचे उद्दिष्ट ३४५ लाख टन निश्चित करण्यात आले आहे..बिझनेसलाईनच्या वृत्तानुसार, पंजाबमधील खरेदी प्रक्रिया संपली असून, येथून १२१.६ लाख टन गहू खरेदी केला आहे. गेल्या वर्षी येथून ११९.२ लाख टन खरेदी करण्यात आली होती. याचाच अर्थ यंदाची खरेदी २ टक्क्यांनी अधिक आहे. केंद्राने २०२६-२७ या वर्षात पंजाबमधून १२२ लाख टन गव्हाच्या खरेदीचे उद्दिष्ट ठेवले होते. तर संपूर्ण २०२५-२६ या वर्षात ११९.२ लाख टन टन गहू खरेदी करण्यात आला होता. पंजाबमध्ये यंदा खरेदी केलेला गहू हा जवळपास शिथिल केलेल्या निकषांनुसार करण्यात आला. कारण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गव्हाचा दर्जा काही प्रमाणात घसरला होता. .Wheat Procurement: केंद्राच्या गहू खरेदीला वेग.हरियाणामधून किती खरेदी?हरियाणामधून सुमारे ८१.२ लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. येथील खरेदी प्रक्रिया १५ मे रोजी पूर्ण झाली. हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक आहे. मागील हंगामात सरकारने हरियाणातून ७१.४ लाख टन गहू खरेदी केला होता..मध्य प्रदेशमधूनही खरेदी अधिकमध्य प्रदेशमधून यंदा ९५ लाख टन खरेदी केली आहे. ही खरेदी गेल्या वर्षाच्या ७८ लाख टनांच्या तुलनेत २२ टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात, केंद्राने राज्याच्या विनंतीनुसार गहू खरेदीचे उद्दिष्ट आधीच्या ७८ लाख टनांवरून वाढवून १०० लाख टनांपर्यंत वाढवले होते. सुरुवातीला खरेदी प्रक्रिया सुरु होण्यास विलंब झाला होता. तसेच वेगही मंदावला होता. याला बारदानांची टंचाई आणि अपुरी खरेदी केंद्रे असल्याचे कारण देत अधिकाऱ्यांनी खरेदी एजन्सींना जबाबदार धरले होते. .Wheat Export:भारताची गव्हाची निर्यात पुन्हा सुरू; शेतकऱ्यांना फायदा? .मध्य प्रदेशमध्ये, केंद्र सरकारने १ एप्रिल ऐवजी १५ मार्चपासूनच शेतकऱ्यांकडून गहू खरेदीला परवानगी दिली होती. असे असतानाही ३० एप्रिलपर्यंत खरेदी ५९ टक्क्यांनी पिछाडीवर राहिली. एप्रिलमध्ये केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी राज्यात खरेदी कमी झाल्याचा मुद्दा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे उपस्थित केला होता..नव्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये खरेदीचे प्रमाण १०.२ लाख टनांवरून वाढून १४.८ लाख टनांवर गेले आहे. तर राजस्थानमधील खरेदी गेल्या वर्षीच्या १८.१ लाख टनांवरून २०.३ लाख टनांवर पोहोचले आहे. बिहारमध्ये आतापर्यंत ३३,२९५ टन खरेदी करण्यात आली असून, गेल्या वर्षाच्या १७,६०९ टनांच्या तुलनेत यंदा त्यात ८९ टक्के वाढ नोंदवली आहे. सरकारनेही उत्तर प्रदेशमधून खरेदीचे उद्दिष्ट आधीच्या १० लाख टनांवरून वाढवून २५ लाख टनांपर्यंत, राजस्थानमध्ये २१ लाख टनांवरून २३.५ लाख टनांवर आणि बिहारमध्ये १८ हजार टनांवरून १.८ लाख टनांपर्यंत वाढवले आहे..मार्च आणि एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाचा गहू पिकाला फटका बसला होता. यामुळे धान्यामधील ओलाव्याचे प्रमाण अधिक राहिले. तसेच त्याचा दाणा सुरकुतलेला आणि त्याची चमक कमी होणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. ही परिस्थिती लक्षात घेता सरकारने गुणवत्तेचे निकष शिथिल केले होते. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.