New Delhi News: वाढते तापमान आणि कमी पावसामुळे देशातील पाणीसाठा झपाट्याने खालावला आहे. धरणे निम्मी रिकामी झाली असल्याचे चित्र दर्शविणारी आकडेवारी केंद्रीय जल आयोगाने प्रसिद्ध केली आहे. .आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशातील प्रमुख १६६ धरणांपैकी सुमारे ४० टक्के धरणांतील पाणीसाठा या आठवड्यात त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांहून खाली आला आहे. तसेच, एकंदर सर्वच धरणांचा विचार केल्यास, त्यांच्या एकूण पाणीसाठ्यात घट होऊन तो ५१ टक्क्यांवर आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून देशातील सुमारे ७० टक्के भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे अथवा अजिबात पाऊस पडलेला नाही..यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. ७२६ जिल्ह्यांतून मिळालेल्या आकडेवारीनुसार, १ मार्चपासून देशातील ७८ टक्के भागांत कमी प्रमाणात अथवा अजिबातच पाऊस पडलेला नसल्याचे भारतीय हवामान विभागाला दिसून आले आहे..River Water Level: सिंधुदुर्गातील नद्यांच्या पाणीपातळीत घट.दक्षिणेत ४१ टक्के पाणीसाठादक्षिणेतील ४७ धरणांमध्ये, त्यांच्या ५५.२८८ अब्ज घनमीटर क्षमतेच्या तुलनेत २२.८३० अब्ज घनमीटर इतका म्हणजेच सुमारे ४१ टक्के इतका पाणीसाठा आहे. तेलंगणाच्या धरणांतील पाणीसाठा ३५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. तर कर्नाटकातील पाणीसाठा ४० टक्क्यांच्या खाली आला आहे. केरळ आणि तामिळनाडू राज्यांतील धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. येथील धरणांतील साठा ४५ टक्क्यांच्या खाली घसरला आहे. तर आंध्र प्रदेशात एकूण क्षमतेच्या तुलनेत ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे..पंजाबमध्ये ५५ टक्के पाणीसाठाउत्तर भारतातील ११ धरणांत १९.८३६ अब्ज घनमीटर क्षमतेच्या तुलनेत ९.०४१ अब्ज घनमीटर पाणीसाठा आहे. हे प्रमाण ४५.५ टक्के एवढे आहे. हिमाचल प्रदेशातील पाणीसाठा ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरला. तर पंजाब आणि राजस्थानमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक साठा शिल्लक आहे..Water Conservation: शेततळ्यांनी दिली शाश्वत शेतीला नवी दिशा.प. बंगाल, आसाममध्ये स्थिती चिंताजनकदेशाच्या पूर्व भागात २७ धरणांत, त्यांच्या एकूण २१.७५९ अब्ज घनमीटर क्षमतेच्या तुलनेत १०.८८१ अब्ज घनमीटर एवढा म्हणजेच ५० टक्के साठा शिल्लक आहे. आसाममधील पाणीसाठा २० टक्क्यांच्या खाली आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये हे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ओडिशात साठा ५२ टक्के आहे..पश्चिम विभागाकडे नजर टाकल्यास येथील ५३ धरणांतील पाणीसाठा क्षमता ३८.०९४ अब्ज घनमीटर इतका असून, त्या तुलनेत २३.५२२ अब्ज घनमीटर म्हणजेच जवळपास ६२ टक्के साठा शिल्लक आहे. गोव्यातील एकमेव धरणात सुमारे ६५ टक्के साठा आहे. गुजरातमध्ये ६० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.मध्य भारतातील २८ धरणांत ४८.५८८ अब्ज घनमीटर क्षमतेच्या तुलनेत ५७ टक्के साठा उपलब्ध आहे. हे प्रमाण छत्तीसगडमध्ये ७१ टक्के, तर मध्य प्रदेशात ५९ टक्के आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील साठा प्रमाण अनुक्रमे ५१ टक्के आणि ४३ टक्के असल्याचे दिसून आले आहे..शिल्लक पाणीसाठाकेंद्रीय जल आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रमुख धरणांतील १८३.५६५ अब्ज घनमीटर इतक्या क्षमतेच्या तुलनेत सध्या केवळ ५१ टक्के म्हणजेच ९४.०६३ अब्ज घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे..पश्चिम भारतात स्थिती समाधानकारकपश्चिम, पूर्व आणि मध्य भारताच्या धरणांतील पाणीसाठा ५० टक्क्यांहून अधिक आहे. तर दक्षिण भारतातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी झाला असला, तरी देशातील एकूण पाणीसाठा या तुलनेत १३.५ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या १० वर्षांतील पाणीसाठ्याची आकडेवारी पाहता तो सरासरी पातळीच्या २६ टक्क्यांनी अधिक आहे..घट कमी होण्याची शक्यताभारतीय हवामान विभागाकडून देशातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे धरणांतील पाणी पातळीत घट होण्याचा वेग गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.