Jaishankar Statement : भारताने दिली इराणच्या युद्धनौकेला शरण; परराष्ट्रमंत्री जयशंकर राज्यसभेत युद्धावर काय म्हणाले?
Parliament Debate : इस्त्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे पश्चिम आशियात भूराजकीय परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. त्याची भारतालाही झळ बसत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला.