Thane News : जिल्हा परिषद ठाणेअंतर्गत कृषी विभागातील ई-कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
भिवंडी येथील दिवे अंजूर येथे शेतकरी बचत गटांना ई- कार्ट लोकार्पण सोहळा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत बचत गट यांना ई-कार्ट पुरविणे ही नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.
योजनेंतर्गत शेतकरी बचत गटांनी स्वत: पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बचत गटांना स्वत:चे वाहन उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होईल, व इतर कामासाठी देता येईल.
वाहनामुळे भाजीपाला स्वच्छ व ताजा राहून भाजीपाला विक्रीचा पूर्ण मोबदला शेतकरी बचत गटांना होणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून लाभ द्यावा, अशा सूचना पाटील यांनी केल्या.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.