Mumbai News : बदलते हवामान, पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामातील भात पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या नुकसानीची कमतरता कमी व्हावी आणि अतिरिक्त उत्पादन, उत्पन्न मिळावे या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीची योजना कार्यरत आहे. डहाणूतील शेतकऱ्यांच्या बांधावर तुरीची हिरवीगार पिके डोकावू लागली आहेत.
मागील काही वर्षांपासून परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान होत आहे. मात्र बांधावर तूर लागवड केल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी भाताबरोबर तूर बियाण्यांचे वाटप कृषी विभागामार्फत झाले आहे. परिणामी तूर लागवड क्षेत्र वाढले, तसेच रोजच्या आहारात मुबलक प्रमाणात प्रथिनांचा स्त्रोत असलेल्या कडधान्याचा समावेश झाल्याने आदिवासी भागातील कुपोषण मुक्तीसाठी बांधावरील तूर लागवड योजनेचा फायदा होत आहे, असे मत उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आदि माध्यमातून भात बियाणे वाटप, तर आत्मा अंतर्गत या वर्षी प्रति कुटुंब एकरी २५० ग्रॅम बियाणे शेतीच्या बांधावर तुरीच्या लागवडीसाठी विनामूल्य वाटप केल्यामुळे लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.