Drought Condition : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Farmer Issue : यंदाच्या दुष्काळी स्थितीत हाती आलेली रब्बी ज्वारी, हरभरा यांसह फळे, भाजीपाला पिकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत रानडुक्कर, नीलगाय, हरीण आदी वन्य प्राण्यांकडून जिरायती तसेच बागायती क्षेत्रातील विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली जात आहे. यंदाच्या दुष्काळी स्थितीत हाती आलेली रब्बी ज्वारी, हरभरा यांसह फळे, भाजीपाला पिकांचे वन्यप्राण्यांनी नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा. पीक नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत तुलनेने वनांचे प्रमाण कमी आहे. अलीकडील काही वर्षामध्ये रानडुक्कर, नीलगायी (रोही), हरीण आदी वन्य प्राणी थेट शेतीपिकांमध्ये घुसून नासाडी करत आहेत. गावापासून दूर असलेल्या शेतामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव अधिक आहे. शेतकरी दिवसभर पिकांची राखण करतात.

Crop Damage
Crop Damage : मळगाव परिसरातील नाचणीची पाने करपली

परंतु रात्रीच्यावेळी पिकांमध्ये घुसून रानडुक्कर, नीलगायी पिकांची नासाडी करत आहे. पिकाचे संरक्षण करत असताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकरी गंभारी जखमी झाले आहेत. यंदाच्या हंगामातील कणसावर आलेल्या रब्बी ज्वारी पिकांत घुसून रानडुकरांनी कणसे फस्त केली आहेत. ज्वारीचे धांडे मोडली आहेत. धान्य व कडबा असे दुहेरी नुकसान झाले आहे. नासधूस केलेल्या पिकांची काढणी करणे कठीण काम आहे. निलगायींनी घाटे लागलेल्या हरभरा पीक खुंदळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

मॉन्सून्नोत्तर पावसामुळे या दोन जिल्ह्यांतील रब्बीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली. त्यामुळे ज्वारी, हरभऱ्याचा पेरा वाढला आहे. परंतु हाती आलेल्या पिकांची वन्यप्राण्यांनी मोठी नासधूस केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Crop Damage
Crop Damage Complaints : कापूस, तूर नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीने स्वीकाराव्यात
आमच्या भागात नीलगायींकडून पिकांची खूप नासाडी केली जात आहे. यंदा तुरीचे मोठे नुकसान केले. त्यानंतर आता हरभरा, गहू आदी मोठे नुकसान केले आहे. नुकसान भरपाई मिळत नाही. वन्य प्राणी शेतकऱ्यांवर हल्ले करत आहेत. बंदोबस्त केला जात नाही. राज्य शासनाने शेतीला कुंपणासाठी अनुदान योजना सुरू करावी.
शंकर गुट्टे, बेलुरा, जि. हिंगोली
रानडुकरांकडून उन्हाळी भुईमुगाचे नुकसान केले जात आहेत. इतर शेतकऱ्यांचे ज्वारीचे नुकसान केले आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांना संरक्षण देण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात.
बाजीराव शेवाळे, गणपूर, ता. जिंतूर, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com