Satara News: सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ आणि पंचायत समितीच्या १२९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला जिल्हा परिषदेत बहुमताचा आकडा सायंकाळी चारपर्यंत गाठता आलेला नाही. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला २१, राष्ट्रवादी काँग्रेसला २०, तर शिंदेंच्या शिवसेनेला १५ जागा मिळाल्या आहेत. तर उर्वरित जागांचे निकाल अद्याप हाती आले नव्हते..भाजपला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेची शिवसेना मिळून सत्ता स्थापन करू शकतात. पण राज्यातील सत्तेचा विचार करताना एकनाथ शिंदेंची शिवसेना ज्यांच्यासोबत जातील, त्यांची सत्ता येणार आहे. जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांपैकी सातारा व खटाव पंचायत समितीत भाजपची सत्ता आली आहे. तर वाई, खंडाळा, कोरेगाव या पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीकडे राहिली असून पाटण शिवसेनेकडे तर जावळी, माण, महाबळेश्वर, फलटण समसमान झाल्यामुळे चिठ्ठीव्दारे सत्ता कोणाकडे हे स्पष्ट होणार आहे. सायकांळी पाचपर्यंत कऱ्हाड तालुक्यातील निकालाचे चित्र स्पष्ट झाले नव्हते..Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या वेळेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली. तर पाटण, फलटण, कोरेगावमध्ये शिंदेंची शिवसेनेशी लढत झाली. जिल्हा परिषदेतील सत्ता हातून जाऊ नये यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या. लोकसभेच्या निवडणुकीपासून आघाडी घेतलेल्या भाजपला यावेळेस कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावायचा होता. त्यादृष्टीने त्यांचे दोन मंत्री आणि दोन आमदार यांनी प्रयत्न केले. तर जिल्ह्यात कोरेगाव आणि पाटण तालुक्यांत ताकत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेने यावेळेस फलटण, कोरेगाव, पाटण, जावळी, महाबळेश्वर, सातारा तालुक्यांतही उमेदवार दिले होते..निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे झालेले अपघातील निधन राष्ट्रवादी काँग्रेसला धक्कादायक ठरले. पण, त्यांच्या निधनाच्या सहानुभूतीचा फायदा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत फारसा झाला नाही. मागील निवडणुकीत ४१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला यावेळेस निम्म्यापेक्षा थोड्याफार जागा मिळवता आल्या आहेत. तर फलटणमध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेच्या साथीने आपली सत्ता राखण्यात यश मिळविले आहे..Satara Development: सातारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे.सोमवारी झालेल्या निकालात सायंकाळी चारपर्यंत कोणत्याच पक्षाला जिल्हा परिषदेच्या सत्तेत जाण्यासाठीचा बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. उलट शिंदेंच्या शिवसेनेला कधी नव्हते १५ च्या वर सदस्य निवडून आणले आहेत. भाजपचे २१ सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेसचे २० सदस्य निवडून आले आहेत. तर अकरा पंचायत समित्यांपैकी दोन भाजप, तीन राष्ट्रवादीकडे आणि जावळी, माण, महाबळेश्वर आणि फलटणमध्ये समसमान झाले आहेत..सातारा व खटाव पंचायत समितीत भाजपची सत्ता आली आहे. तर वाई, खंडाळा, कोरेगाव या पंचायत समितीची सत्ता राष्ट्रवादीकडे राहिली असून पाटण शिवसेनेकडे तर जावळी, माण, महाबळेश्वर, फलटण समसमान झाल्यामुळे येथे चिठ्ठीव्दारे सत्ता कोणाकडे जाणार हे स्पष्ट होणार आहे. सातारा तालुक्यात वर्णे गटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी बाजी मारत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.