
Washim News: विविध संकटांमुळे यंदा मंगरूळपीर तालुक्यातील शेकडो एकर शेती पडीक असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.तालुक्यात प्रारंभी साधारण पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र नंतर पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे बियाणे उगवले नाही.
परिणामी, शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर दुबार पेरणी केल्यानंतर लगेच पाऊस आला. हा पाऊस सलग आठ दिवस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पुन्हा बियाणे उगवले नाही.
अशा विपरीत परिस्थितीमध्ये काहींनी तिबार पेरणी केली. तीही फसली. पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही.यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च झाला. काही शेतकऱ्यांनी पेरणीला उशीर झाल्यामुळे उत्पन्नात घट येईल, याशिवाय महागडे बियाणे, शेतमजुरीचे वाढते दर, रासायनिक खताची बेसुमार भाववाढ याचा विचार करून पेरणीच केली नाही. यामुळे तालुक्यातील शेकडो एकर शेती पडीक ठेवली आहे.
शेतीपेक्षा मजुरी बरी
चिखलगड येथील शेतकरी बाबाराव इंगोले, गजानन इंगोले, उमेश वाडेकर, गौतम तायडे, मोतिराम इंगोले, विलास इंगळे, शंकर इंगळे, गणेश राठोड, दारासिंग राठोड, मुंगशिरम इंगोले, अवधूत धवसे, मोहन राठोड आदींनी यंदा ७० एकर क्षेत्रांवर पेरणी केलेली नाही.
याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले, की बियाणे, खते, कीटकनाशकांच्या वाढत्या किमती, वाढलेली मजुरी, शासनाचे उदासीन धोरण, नैसर्गिक आपत्ती, वन्य प्राण्यांचा हैदोस, शेतीमालाला अल्प भाव आदी कारणांमुळे त्रस्त झालो आहे. त्यामुळे शेती केल्यापेक्षा बाहेरगावी जाऊन मजुरी केलेली बरी, अशा शब्दांत या शेतकऱ्यांनी व्यथा व्यक्त केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.