Raigad News: राज्यात यावर्षी पावसाने चक्क सहा महिने तळ ठोकला होता, त्यानंतर ऐन दिवाळीमध्ये थंडीचे वातावरण होते. त्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून हवेत प्रचंड गारठा पडला असताना मंगळवारी (ता. १३) हवामानात दुपारी उष्मा जाणवत होता. या हवामानामुळे आंबा, काजू बागयतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते..सुपारी व्यावासायिक सुपारी मोठ्या संख्येने वाळत टाकत असल्याने या पावसाचा शिडकावा झाला, तर सुपारी भिजल्यानंतर तिची प्रतवारी घटत असल्याचेही सांगण्यात आले. साधारण चौल-रेवदंडा हा बागायती प्रदेश असल्याने शिमग्यापर्यंत या ठिकाणी वातावरण आल्हाददायक असते, .Climate Change Impact: उत्तराखंडच्या शेतीला हवामान बदलाचा फटका.परंतु आता वाढलेल्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता घसरत चालल्याचे मत जाणकरांनी व्यक्त केले. गेले दोन दिवस अचानक हवामानात बदल झाला असून, दुपार सुरू झालेल्या उष्म्यामुळे आंबा पिकाला आलेल्या मोहोरावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याची शक्यता आंबा पीक घेणारे प्रवीण गावंड (रा. देवघर) यांनी सांगितले..Climate Change Impact: कमीअधिक थंडीसह पावसाच्या अंदाजानुसार करावयाचे व्यवस्थापन.बाधित शेतकऱ्यांसाठी मोबदल्याची मागणीपेण (वार्ताहर) : पेण व रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरून जाणाऱ्या कंडक्टर बदल कामासह ४०० के. व्ही. विद्युतपुरवठा वाहिनीची कामामुळे बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा..या मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. रोहा तालुक्यातील कानसई ते पेण तालुक्यातील कासरूघुंटवाडी-निगडे परिसरातील शेतकऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.