Mumbai News: राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पूर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निदर्शक आहे. .देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकविण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ईव्हीएमवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्य निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे..Maharshtra Politics: सत्ताधाऱ्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाचे काम.श्री. पटोले यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, की मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदारांना दोन-तीन तास करावी लागणारी वणवण, हजारो मतदारांना मतदान न करताच परत जाण्याची येणारी वेळ, या साऱ्या बाबी निवडणूक आयोगाच्या अकार्यक्षमतेचे गंभीर निदर्शक आहेत, ही परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे..Maharashtra Politics: ‘लक्ष्मी दर्शना’चे विकृत प्रदर्शन .अत्यंत गंभीर बाब म्हणजे पालिका निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला नाही, त्यामुळे आपल्या मतदानाची खात्री करण्याचा मतदाराचा अधिकारच हिरावून घेण्यात आला. त्यात भर म्हणजे मतदारांच्या बोटाला लावलेली शाई हात धुतल्यानंतर पुसली जात होती..या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, विश्वासार्हता आणि आयोगाची निष्पक्षता यावर गंभीर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहेत. जनभावनेचा विचार करून या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असेही पटोले यांनी म्हटले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.