Parinche News: परिंचे (ता.पुरंदर) परिसरात दररोज पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके अतिपावसामुळे पाण्याखाली गेल्याने उद्ध्वस्त झाली आहेत. .यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी सुरेश जाधव यांनी केली आहे.काढणीच्या वेळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. परिंचे, कांबळवाडी, सटलवाडी, चौधरवाडी, हरगुडे,पांगारे, खेंगरेवाडी परिसरात वारंवार मुसळधार पाऊस पडत आहे..Crop Loss: पावसामुळे भिजून कोथिंबीर मातीमोल.परिंचे येथील भोकरबिंदी, शेरी, आटाळी, गव्हळी, वेतळा बाबा परिसरातील पिके पाण्याखाली गेली आहे. अनेक ठिकाणचे क्षेत्र बुधवारी (ता.१७) रात्री झालेल्या पावसामुळे पाण्याखाली गेले. भाग बदलत पाऊस पडत असल्याने काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडत आहे..Soybean Crop Loss: अतिपावसाचा सोयाबीनला दणका.सटलवाडी, चौधरवाडी परिसरात कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत कांदा रोपवाटिकांचे पंचनामे करण्याची मागणी सरपंच सागर करवंदे यांनी केली आहे..‘पंचनामे करण्याचे आदेश देणार’जिल्हाधिकारी यांच्या चर्चा करून पुरंदरचे तहसील यांना नुकसानग्रस्त परिसराचे पंचनामे करण्याचे आदेश देणार आहे. गुंजवणी योजनेच्या कामाची पाहणी उद्या करण्यासाठी येणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.