Sangli News : जिल्ह्यात मे महिन्यापासून मुसळधार पावसाने सुरुवात केली होती. पावसाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका बसला. पुढे जुलै, ऑगस्टमध्ये वारणा, कृष्णा नद्यांना पूर आला. पाच महिन्यांत १५ हजार ३९९ शेतकऱ्यांचे चार हजार ९११.७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. .भरपाईचे नऊ कोटी सात लाख ७८ हजार रुपये शासनाकडून मिळाले असून प्रशासनाकडून भरपाईचे वाटपही सुरू केले आहे. जिल्ह्यात मे ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव, खानापूर, शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. .Crop Damage Compensation : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी ७२१ कोटी ९७ लाख रुपये भरपाई मंजूर.महसूल, कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यामध्ये १५ हजार ३९९ शेतकऱ्यांचे चार हजार ९११.७४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. या नुकसानीची भरपाईची रक्कम शासनाकडून मिळाली असून त्याचे वाटपही चालू झाले आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले..Crop Damage Compensations : लातूर जिल्ह्याला २४४ कोटींची मदत.असा मिळणार भरपाईचा निधीजिरायत पिकांसाठी हेक्टरी : ८५०० रुपयेबागायती पिकांसाठी हेक्टरी : १७००० रुपयेबहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी : २२५०० रुपये.सप्टेंबरमध्ये ३५३५ हेक्टर पिकांचे नुकसानसप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ५७६.५० हेक्टर, तासगाव ३१२ हेक्टर, आटपाडी ३२१.५० हेक्टर आणि जत तालुक्यातील २३१९ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायत २५१५, बागायत ५३६.५० आणि फळपीक ४८३ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे, असा नजरअंदाज महसूल आणि कृषी विभागाने व्यक्त केला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.