
Nagpur News : भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, नागपूर जिल्ह्यातील निम्म्या तालुक्यांमध्ये यंदाच्या मे महिन्यात भूजल पातळीत घट झाली आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ही पातळी कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाणी उपलब्धतेत धोका निर्माण झाला आहे.
जिल्ह्यात गतवर्षी पावसाळ्यात व मान्सूनोत्तर पाऊस चांगला पडला. भूजलातही चांगलेच पाणी मुरले. परंतु तुलनेत पाण्याचा उपसा आणि पाण्याचा अपव्यय वाढत असल्याचे दिसून येते. भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून जानेवारी, मार्च, मे व सप्टेंबरमध्ये भूजल पातळीचे निरीक्षण करण्यात येते. जिल्ह्यात १११ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले.
गेल्या पाच वर्षांमध्ये मे महिन्यातील सरासरी पाणी पातळी ६.९७ मीटर होती, तर यंदा ती ६.८२ मीटर इतकीच नोंदली गेली. या सरासरीतही बहुतांश वाढ ही केवळ ७ तालुक्यांमध्ये असून, कुही, कळमेश्वर, भिवापूर, रामटेक, सावनेर आणि उमरेड या सहा तालुक्यांमध्ये ०.२१ मीटर ते १.०७ मीटरपर्यंत घट झाली आहे.
गेल्या काही वर्षांमधील भूजल पातळीची होणारी घट ही जिल्हावासीयांसाठी चिंतेत टाकणारी आहे. येत्या काही दिवसांत पावसाला विलंब झाला, तर पिण्याचे पाणी, घरगुती वापराचे पाणी आणि सिंचनाचे पाणी यावर मोठे संकट ओढवू शकते. विशेषतः ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी, बोअरवेल्स किंवा काही प्रमाणात पाण्याचा साठा आहे, त्यांनी याचा नियोजनपूर्वक वापर करण्याची वेळ आहे.
पाऊस लांबल्यास काय करावे?
ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब
मल्चिंगचा वापर करून जमिनीतील ओलावा टिकवणे
कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड
जोखमीचे पीक टाळणे आणि अंतरशेतीसारख्या पर्यायांचा विचार
जलसंधारण योजना आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेणे
जलसंवर्धनावर भर देण्यासोबतच पाण्याचा अपव्यय टाळावा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.