शेतकरी नियोजन । पीक : केळीशेतकरी : अमोल गणेश पाटीलगाव : केऱ्हाळे बुद्रूक, ता. रावेर, जि. जळगावएकूण क्षेत्र : ३५ एकरकेळीखालील क्षेत्र : १५ एकर (२४ हजार झाडे).अमोल पाटील यांची केऱ्हाळे, मंगरूळ, कर्जोद, (ता.रावेर, जि.जळगाव) शिवारात ३५ एकर काळी कसदार जमीन आहे. कला शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी वडिलोपार्जित शेती करण्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मोठे बंधू विकास पाटील हे शेती कामांमध्ये त्यांना मार्गदर्शन करतात. केळी प्रमुख पीक असून कांदा, तूर, गहू, मका, हरभरा, हळद ही हंगामी पिके घेतली जातात. केळीमध्ये नवती किंवा मृग बहर (जून, जुलै लागवड) धरला जातो. लागवडीसाठी १०० टक्के उतिसंवर्धित रोपे तसेच कंदांचाही उपयोग केला जातो. ग्रॅण्ड नैन या जातीची केळी रोपे लागवडीसाठी निवडली जातात..Banana Farming: निसवणीच्या अवस्थेतील बागेत केळीचा आकार, दर्जा वाढीसाठी प्रयत्न.लागवड अर्धा फूट उंच व पावणेचार फूट रुंद गादीवाफ्यावर केली जाते. सिंचनासाठी सिंगल लॅटरल वापरली जाते. लागवडीवेळी पाच बाय सहा फूट इतके अंतर राखले जाते. शास्त्रीय पीक व्यवस्थापनातून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सिंचनासाठी जलसाठे मुबलक असून पाच कूपनलिका व एक विहीर आहे. याशिवाय भोकर नदीतील पाण्याचा सिंचनाकामी लाभ होतो. यंदा दोन टप्प्यात केळी लागवड करण्यात आलेली असून जूनमधील बाग निसवणीच्या अवस्थेत आहे. या बागेतील घडांचा दर्जा राखण्यावर आगामी काळात भर दिला जाईल. तर दुसऱ्या टप्प्यातील सप्टेंबरमधील लागवडीची बाग वाढीच्या अवस्थेत आहे. या बागेत वाढीच्या अवस्थेनुसार पीक संरक्षण, सिंचनाचे नियोजन केले जाईल, असे अमोल पाटील सांगतात..व्यवस्थापनातील बाबीकेळी बागेची लागवड मागील वर्षी दोन टप्प्यात करण्यात आलेली आहे. त्यात जून महिन्यात पहिली ५ हजार केळी रोपांची लागवड केली आहे. तर सप्टेंबर महिन्यात दुसरी लागवड १९ हजार केळी रोपांची लागवड केली आहे.लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्राची खोल नांगरट करून जमीन चांगली भुसभुशीत करण्यात आली. जमीन काळी कसदार असल्याने मागील पिकांचे अवशेष जाळले जात नाहीत. कारण ते कुजवून पुढे केळी पिकासाठी उपयुक्त ठरतात..Banana Farming Issue: कडाक्याच्या थंडीमुळे नांदेडला केळीची वाढ खुंटली.लागवडीपूर्वी एकरी तीन ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत देखील वापरले आहे. त्यानंतर जमिनीची पूर्वमशागत केली.सिंचनासाठी १६ मिमीच्या लॅटरल वापरल्या आहेत. दोन ड्रीपमध्ये सव्वा फूट अंतर राखले आहे. त्यातून ताशी दोन लिटर प्रमाणे पाण्याचा विसर्ग होतो. केळी रोपांची लागवड करण्यापूर्वी गादीवाफे चांगले भिजवून घेतले जातात. त्यानंतर रोपांची लागवड केली. लागवडीनंतर चांगला वाफसा कायम ठेवण्यावर भर देण्यात आला..लागवडीपूर्वी रासायनिक खतांचा पहिला बेसल डोस दिला. त्यात सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश तसेच मॅग्नेशिअम सल्फेट व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या प्रति एक हजार झाडांना मात्रा देण्यात आला. दुसरा व तिसरा बेसल डोस देण्यात आलेला नाही. पुढील खते ड्रीपद्वारे देण्यात आली.रोप लागवडीनंतर पाचव्या दिवशी बुरशीनाशके, खते व अमिनो ॲसिडची आळवणी करण्यात आली.लागवड केल्यानंतर सिंचनासंबंधी काटेकोर नियोजन करण्यात आले. वाफसा कायम राखण्यावर भर दिला..YeIakki Banana Farming: इल्लाकी केळी लागवड खानदेशात वाढू लागली.रोग नियंत्रणपावसाळ्यात कुक्कुंबर मोझॅक या विषाणूजन्य (सीएमव्ही) रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पिकात प्रतिबंधात्मक फवारण्या करण्यात आल्या. त्यात रासायनिक बुरशीनाशके व कीटकनाशकांचा वापर केला आहे.केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट महिन्यात दिसून आला. त्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकांच्या फवारणी घेतल्या. रोगग्रस्त पीक अवशेष बागेबाहेर काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आली..मागील कामकाजपीक वाढीच्या अवस्थेत विद्राव्य खतांचा वेळापत्रकानुसार वापर करण्यात आला. विद्राव्य खतांमध्ये १२.६१.० व १९.१९.१९ या खतांच्या प्रति एक हजार झाडांना मात्रा दिल्या आहेत. त्यासोबत सूक्ष्मअन्नद्रव्येही दिली. बाग दीड महिन्याची झाल्यानंतर रासायनिक खतांच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.बागेच्या वाढीसाठी कॅल्शिअम नायट्रेट, बोरॉन, मॅग्नेशिअम सल्फेट यांचा ड्रीपमधून वापर केला आहे. बाग चार महिन्यांची झाल्यानंतर ही कार्यवाही केली आहे..Banana Farming: खानदेशात कांदेबाग केळी लागवडीत घट.थंडीच्या काळात बागेत सल्फरची मात्रा दिली. जूनमध्ये लागवड केलेली केळी बाग सहा महिन्यांची झाल्यानंतर निसवण सुरू झाली. थंडीच्या काळात बागेला दोन दिवसाआड चार तास सिंचन करण्यात आले.सद्यःस्थितीत बागेत निसवण झालेल्या फण्यांची विरळणी केली जात आहे. झाडावर केवळ आठ ते नऊ फण्या ठेवल्या जात आहेत. झाडांवरील अतिरिक्त फुटवे दर आठ दिवसांच्या अंतराने नियमित काढून घेतले जात आहेत.उन्हापासून झाडावर लागलेल्या घडांचे संरक्षण करण्यासाठी घडांवर बागेतील कोरड्या केळी पानांचा चुडा ठेवला जात आहे..आगामी नियोजनजूनमध्ये लागवड केलेल्या पिकात निसवण सुरू असून आगामी काळात निसवण वेगाने होईल. त्यानुसार कार्यवाही केली जाईल.पुढील काळात तापमानात चांगलीच वाढ होत जाईल. त्यानुसार बागेत वाफसा स्थिती कायम राखण्यासाठी सिंचनाचे काटेकोर नियोजन केले जाईल. या कालावधीत प्रतिदिन दोन तास सिंचन केले जाईल.नियोजित वेळापत्रकानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये व सरळ खते दिली जातील. घड तयार होण्यासाठी पोटॅशिअम शोनाईट, १३.००.४५ या खतांचा मात्रा दिल्या जातील..निसवणीच्या बागेत घड नियमित केळीच्या कोरड्या पानांच्या चुड्याने झाकून घेतले जातील. तसेच बागेत फ्रूट केअर तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल.केळी घडांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार शिफारशीत घटकांच्या रासायनिक फवारण्या घेतल्या जातील.दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये लागवड केलेली केळी बाग ही वाढीच्या अवस्थेत आहे. या बागेत रासायनिक खतांच्या नियोजित मात्रा दिल्या जातील. पीक वाढीसह खोडाच्या मजबुतीसाठी आवश्यक खते आगामी काळात दिली जातील..बागेत करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गरजेनुसार ड्रीपमधून रासायनिक बुरशीनाशकांचा वापर केला जाईल.बागेत झाडांना आलेले अतिरिक्त फुटवे काढून घेण्याची कार्यवाही केली जाईल.घडांवर पोटॅश व बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाईल.सध्या रात्री थंड व दिवसा उष्णता अशी हवामान स्थिती आहे. त्यामुळे या काळात केळीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी बागेचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार घड संरक्षण, कीड-रोग व्यवस्थापनासह सिंचनाचा निर्णय घेतला जाईल.- अमोल पाटील९७६४०६९४११(शब्दांकन ः चंद्रकांत जाधव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.