New Delhi News: ‘‘हवामानातील अस्थिरता, भूजल पातळी खालावणे, मातीचे आरोग्य बिघडणे, असुरक्षित पुरवठा साखळी आणि अनिश्चित जागतिक बाजारपेठांमुळे जगभरातील अन्न यंत्रणा दबावाखाली आहे. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शेतीत परिवर्तन घडवू शकते,’’ असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले..नवी दिल्ली येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-२०२६’ मध्ये ‘एआय फॉर ॲग्रिकल्चर: स्केलिंग इंटेलिजेंस फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स’ या विषयावर ते शुक्रवारी (ता. २०) बोलत होते. यावेळी त्यांनी शेती क्षेत्रासमोरील वाढत्या जागतिक आव्हानांकडे लक्ष वेधले..Food Processing Industry: अन्न प्रक्रिया उद्योगात राज्याची आघाडी कायम.ते पुढे म्हणाले, की ग्लोबल साउथमधील देशांसाठी शेती ही केवळ एक आर्थिक उलाढालीचे साधन नाही तर उपजीविका, सामाजिक स्थिरता आणि राष्ट्रीय सुरक्षेचा एक आधारस्तंभ आहे. भारताने या वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला देशाच्या विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे..इंडिया एआय मिशनचे उद्दिष्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समावेशकता, पारदर्शकता आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करणे हे असून त्याच्या केंद्रस्थानी शेती क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतातील सुमारे ५० कोटी लोक थेट अथवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. छोट्या शेतकऱ्यांना आजही विस्कळित स्वरूपात मिळणारी माहिती, वाढता निविष्ठा खर्च, हवामानातील अनिश्चितता तसेच कर्ज सुविधा आणि बाजारपेठेपर्यंत मर्यादित प्रवेश आदी समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले..पारंपरिक विस्तार यंत्रणा कटिबद्ध असल्या तरी या वाढत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली व्यापकता आणि गतीशी जुळवून घेण्यास त्या अपुऱ्या पडत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवू शकते. स्थानिक हवामान अंदाज, पिकावरील कीड प्रादुर्भावाबाबत पूर्वसूचना, सिंचन आणि खतांसाठी अचूक सल्ला, पिकांवर आधारित कर्ज मूल्यमापन, पारदर्शक व शोधण्यायोग्य पुरवठा साखळ्या तसेच रिअल-टाइम बाजार सल्ला यांसारख्या उपायांद्वारे शेतीत परिवर्तन घडवू शकतो, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला..Food Processing Issue: अन्नप्रक्रिया उद्योगांना अर्थसंकल्पात प्राधान्य नाही.या वेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री नीतेश राणे, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या (MSSRF) अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामीनाथन, जागतिक बँकेच्या दक्षिण आशिया विभागाचे उपाध्यक्ष जोहॅन्स झूट, एकस्टेप फाउंडेशनचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर मरुवाडा उपस्थित होते..‘‘सर्वच एआय, ओपन एआय आणि आयआयटी मुंबई या तिघांसोबत आम्ही सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून एआयचे जे काही मॉडेल्स आहेत; ते आपण तयार करणार आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एआयचा उपयोग करून त्याला स्केलवर कसे न्यायचे, हे यांच्या माध्यमातून करणार आहोत. चॅटजीबीटी प्रमाणे राज्याचे आपले मॉडेल तयार करत आहोत,’’ असेही त्यांनी सांगितले..शेतकऱ्यांकडून ‘एआय बॉट’चा वापरमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘सर्वच क्षेत्रात ‘एआय सज्ज’ असे आपले राज्य असेल, असे त्यांनी सांगितले. ‘‘शेतीतील उत्पादन खर्च कसा कमी करता येईल?, कीडनाशक फवारणी कशी करावी? बाजाराशी संपर्क कसा असावा? या सर्व गोष्टी आपल्या शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळत आहेत. भारत सरकारची अॅग्रिस्टॅक योजना ‘महाविस्तार’शी जोडल्यानंतर आज महाराष्ट्रातील २५ लाख शेतकरी एआय बॉटचा वापर करत आहेत. हवामान अनुकूल शेतीच्या दिशेने आम्ही जात आहोत.’’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.