Orange Subsidy : मोसंबीच्या बागांसाठी हेक्टरी लाखाचे अनुदान द्या

MLA Rajesh Tope : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांनी केलेल्या मदतीच्या धर्तीवर शासनाने हेक्टरी १ लाख रुपये अनुदान मंजूर करावे अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी केली.
MLA Rajesh Tope
MLA Rajesh TopeAgrowon

Ghansawangi News : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या फळबागा वाचविण्यासाठी २०१२ मध्ये तत्कालीन कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांनी केलेल्या मदतीच्या धर्तीवर शासनाने हेक्टरी १ लाख रुपये अनुदान मंजूर करावे अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी केली.

तालुक्यातील बहिरगड, राजेगाव व मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे पाण्याअभावी जळून जात असलेल्या मोसंबीच्या बागांची पाहणी करताना त्यांनी शासनाकडे मागणी केली. यावेळी आमदार टोपे म्हणाले की, ऐन दुष्काळात मोसंबीच्या फळबाग वाचवण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान आहे. फळबाग जळाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते.

MLA Rajesh Tope
Orange Subsidy : व्यापाऱ्यांऐवजी शेतकऱ्यांना मिळावे संत्रा अनुदान

त्यामुळे बाग वाचवण्यासाठी धडपड असते. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाणीटंचाई सर्वात मोठी समस्या आहे. भर उन्हाळ्यात फळबाग वाचवणे कठीण झाले आहे. आतापर्यंत हजारो हेक्टरवरील फळबागा जळाल्या आहेत. मोसंबी फळबागांचे सर्वात जास्त नुकसान झाले.

सर्वाधिक फळबाग क्षेत्र असलेल्या जालना जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न बिकट झाला आहे. परिसरातील शेतकरी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करीत आहेत.पाण्याचे व्यवस्थापन, फळझाडांची निगा,बाष्पीभवन रोखण्यासाठी सेंद्रीय आच्छादन अशा उपाययोजनांद्वारे शेतकरी प्रयत्न करीत आहे.

फळबाग जगवणे महत्त्वाचे

‘दरवर्षी पाणी टंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी शेतात शेततळे केले आहे. शेततळ्यात किमान सहा महिने पाण्याची व्यवस्था होते. या पाण्यावरच मोसंबीची फळबाग वाचवली जाते. मोसंबीच्या प्रत्येक झाडाला दररोज १२० ते १५० लिटर पाण्याची आवश्यकता असते.उन्हाळ्यात उत्पादन घेण्याऐवजी फळबाग जगवणे महत्त्वाचे आहे.

MLA Rajesh Tope
Orange Export Subsidy : संत्रा निर्यात अनुदानावर अखेर शासनाचे शिक्‍कामोर्तब

दुष्काळात शेतकऱ्यांनी खचून न जाता आपल्या फळबागांची व्यवस्था केली परंतु आता विहीर, शेततळ्यातील व बोअर मधील पाणी आटल्याने शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा जळून जात आहेत.

तात्काळ पंचनामे करून मदत द्या

शेतकऱ्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या मोसंबीच्या बागा डोळ्यादेखत पाण्या अभावी जळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.मुला-मुलीचे शिक्षण,लग्न व कुटुंबाचा आर्थिक स्रोत मोसंबी बागावर अवलंबून असल्याने शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोसंबी बागा वाचवण्यासाठी हेक्टरी एक लाख आर्थिक मदत करावी अशी आमदार राजेश टोपे यांनी शासनाकडे मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com