Agriculture Irrigation : शेतकऱ्यांना दिलासा: गिरणा धरणाचे पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत

Girna Dam : गिरणा पट्ट्यासाठी ‘गिरणा’ धरणातून काही दिवसांपूर्वी नदीत दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते.
Girna Dam
Girna DamAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : गिरणा पट्ट्यासाठी ‘गिरणा’ धरणातून काही दिवसांपूर्वी नदीत दोन हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले होते. हे पाणी नदीच्या शेवटच्या भागात किंवा कानळदा (ता. जळगाव) गावापर्यंत पोहोचले आहे.

गिरणा पट्टा पाण्यासाठी कासावीस होता. पण यंदा गिरणा धरण १०० टक्के भरले होते. नदीही प्रवाही होती. त्यात आवर्तने मिळत असल्याने याचा लाभ नदीकाठच्या भागास होत आहे. गिरणा धरणातून दुसरे आवर्तन केव्हा सोडण्यात येते याकडे लागले होते. निम्मा जळगाव जिल्ह्याची पाण्याची तहान गिरणा धरणावर अवलंबून आहे.

यंदा धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. धरणातून पिण्याच्या पाण्यासह रब्बीसही आवर्तन सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला होता. धरणातून तिसरे आवर्तन एप्रिलमध्ये सुटेल. गिरणा पट्ट्यात सध्या तीव्र पाणीटंचाई कुठेही जाणवत नाही. परंतु प्रशासनाचा निर्णय व गिरणा पट्ट्यातील मागणी यासाठी नदीत दुसरे आवर्तन सोडण्यात आले होते.

Girna Dam
Agriculture Irrigation : पाण्याचा अपव्यय टाळून सिंचनाला प्राधान्य द्या

तिसरे आवर्तन एप्रिलमध्ये तर चौथे मे मध्ये

यंदा गिरणा धरणातून बीगर सिंचनासाठी चार आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत दोन आवर्तने सोडण्यात आली आहेत. तिसरे आवर्तन एप्रिलमध्ये सोडण्यात येणार आहे. तर मे मध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात चौथे आवर्तन सोडता येणार आहे. सद्यःस्थितीत धरणात सुमारे ६८ टक्के पाणीसाठा आहे.

एका आवर्तनाला १०-१२ टक्के पाणीसाठा लागतो. त्यामुळे हे आवर्तन सोडल्यानंतर पाणीसाठा कमी होणार आहे. पुढे पावसाळा लांबल्यास जूनमध्ये पाचवे आवर्तन सुटू शकते. गिरणा धरणावर चाळीसगाव नगर परिषद, जळगाव महापालिका, नांदगाव व सुमारे ५६ गावे, दहिवाळ व २५ गावे पाणी योजना अवलंबून आहे. याशिवाय भडगाव, पाचोरा शहरासही या धरणातून पाणी दिले जाते.

Girna Dam
Agriculture Irrigation : चणकापूर धरणाच्या आवर्तनासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

कानळदापर्यंत पाणी

गिरणा धरणातून २००० क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. ते जळगाव तालुक्यातील कानळदापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे गिरणा काठावरील गावांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

सद्य:स्थितीला काठावरील काही गावांना किरकोळ टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाचोरा व अन्य शहरांसह नदीकाठच्या गावांनाही नदीतील पाण्याने दिलासा मिळतो. पावसामुळे गिरणा नदी वाहत होती. पाणी पातळी नदीकाठी यंदा स्थिर आहे. त्यात या आवर्तनाची भर पडत आहे.

धरणात मुबलक पाणीसाठा

‘गिरणा’ धरणात सद्य:स्थितीला पाणीसाठा मुबलक आहे. जिवंत पाणीसाठा सोडून ३००० हजार दशलक्ष घनफूट एवढा मृत साठा आहे. आवर्तनासाठी १ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते, अशी माहिती मिळाली. यंदा धरण १०० टक्के भरले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com